Welcome You All

RSS
Showing posts with label Agriculture. Show all posts
Showing posts with label Agriculture. Show all posts

शेतकऱ्यांच्या 'मसिहा'चा गौरव

बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील समौता गावामध्ये एक आगळावेगळा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभामध्ये भात उत्पादकांनी फिलिपिन्स येथील आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्रातील पैदासकार आणि "सब-1'जनुकाचे संशोधक डॉ. डेव्हिड मॅकील यांचा सत्कार केला. या सत्काराचे कारण म्हणजे भाताची "स्वर्ण-सब-1' ही जात या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनात आशेचा किरण घेऊन येणारी ठरली.
बिहारमधील चंपारण या जिल्ह्यात दरवर्षी पुराच्या पाण्याचा फटका भात शेतीला बसतो, त्यामुळे भात शेतीचे नुकसान हे ठरलेले; परंतु या भागातील शेतकऱ्यांना भात लागवडीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे हे शेतकरी पुराच्या पाण्यात तग धरून राहील अशा जातीच्या शोधात होते. गेल्यावर्षी पुसा येथील (बिहार) राजेंद्र कृषी विद्यापीठाने चंपारण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना "स्वर्ण-सब-1' ही जात लागवडीसाठी उपलब्ध करून दिली. चंपारण जिल्ह्यात दरवर्षी किमान आठ ते 12 दिवस पुराचे पाणी शेतामध्ये थांबून राहते, त्यामुळे भात रोपे कुजून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते; परंतु गेल्यावर्षापासून शेतकऱ्यांनी "स्वर्ण-सब-1' या जातीची लागवड पूरग्रस्त भागात सुरू केली. ही जात पुराच्या पाण्यात तग धरून राहिली, तसेच पूर ओसरल्यानंतर रोपांची चांगली वाढ झाली. शेतकऱ्यांना या जातीपासून प्रति हेक्‍टरी सरासरी पाच ते सहा टन उत्पादन मिळाले. या जातीच्या तांदळाचा दर्जा चांगला आहे, त्याचबरोबरीने भातही लवकर शिजतो, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे "स्वर्ण-सब-1' ही जात शेतकऱ्यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे या जातीच्या संशोधकाला भेटण्याची शेतकऱ्यांची इच्छा हाती, ती यंदाच्या एप्रिल महिन्यात पूर्णही झाली.
एप्रिल महिन्यात डॉ. मॅकील हे भारतातील संशोधन केंद्रांच्या दौऱ्यावर होते. हे शेतकऱ्यांना कळल्यावर त्यांनी राजेंद्र कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. जे. पी. सिंग यांच्या माध्यमातून भेटीचे आमंत्रणही दिले. शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देत डॉ. मॅकील 8 एप्रिल रोजी समौता गावात दाखलही झाले.
या वेळी चंपारण जिल्ह्यातील सुमारे साठ शेतकऱ्यांनी एकत्र येत खास समारंभात डॉ. मॅकील यांचा "शेतकऱ्यांचा मसिहा' म्हणून गौरव केला. या वेळी शेतकऱ्यांनी "स्वर्ण-सब-1' या जातीच्या लागवडीचे अनुभव, तसेच भात शेतीमधील अडचणी सांगितल्या. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन भाताच्या जातींच्या निर्मितीमध्ये तशा पद्धतीने संशोधन सुरू असल्याची ग्वाही डॉ. मॅकील यांनी दिली.

पुरात तग धरणारी "स्वर्ण-सब-1'
आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्रातील पैदासकार डॉ. मॅकील यांनी पुराच्या पाण्यातही तग धरून राहणाऱ्या "स्वर्ण-सब-1' या जातीची निर्मिती केली. ज्या ठिकाणी दरवर्षी पुराचे पाणी आठ ते 10 दिवस साचून राहते, त्या भागात या जातीची लागवड फायदेशीर दिसून आली आहे. जगभरातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना या जातीच्या लागवडीमुळे शाश्‍वत उत्पादनाची खात्री मिळणार आहे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

द्राक्षवेलीच्या वाढीकडे लक्ष ठेवा

सध्या पावसाळी वातावरण असल्याने द्राक्ष बागेत काही चांगल्या घडामोडी होत आहेत, तर काही ठिकाणी थोड्याफार समस्या दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये बागेत काय उपाययोजना कराव्यात याबद्दलची माहिती आजच्या लेखामध्ये घेत आहोत.

नवीन बाग :
पावसाळी वातावरणामुळे द्राक्ष बागेत आर्द्रता वाढली आहे. ती आर्द्रता वेलीच्या शाकीय वाढ होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे; परंतु हीच आर्द्रता जास्त वाढली असल्यास आणि बागेत जर पाऊस असेल, नवीन फूट वाढत असल्यास अशा वेळी बागेत रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्‍यता राहील. या बागेत पाऊस झाला असल्यास नवीन फुटींवर थोड्याफार प्रमाणात करपा दिसू शकतो. अशा परिस्थितीमध्ये तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वेळीच करपा नियंत्रण फायद्याचे राहील.
ही फूट निघत असताना आपल्याला वाढीचा जोम जास्त दिसेल. या जोमाचा फायदा व्हावा म्हणून आपण ओलांड्यावर पुन्हा दोन ते तीन काड्या मिळतील. या दृष्टीने प्रयत्न करत असतो; परंतु जर वाढीचा जोम जास्त असेल तर वेलीमध्ये जिब्रेलीन्सचे प्रमाण जास्त झाल्यास त्याचा विपरीत परिणाम घडनिर्मितीवर होऊ शकतो. पुन्हा वातावरण जर ढगाळी असेल तर घडनिर्मिती होण्याकरिता बाधा निर्माण होऊ शकते.
वेलीची वाढ चांगली व्हावी या दृष्टीने आपण नत्र व स्फुरदची पूर्तता करतो, तेव्हा दिलेले अन्नद्रव्य व त्याचसोबत वाढती आर्द्रता यामुळेच बागेत वाढीचा जोम जास्त दिसतो. अशा परिस्थितीमध्ये बागेत नत्रयुक्त खताचा वापर काही काळाकरिता बंद करावा. याचसोबत अपेक्षेप्रमाणे घडनिर्मिती होण्याच्या दृष्टीने शिफारशीत संजीवकाचा वापर या वेळी महत्त्वाचा राहील.
बऱ्याचशा बागेत या वेळी पानावर अन्नद्रव्याची कमतरता दिसून येते. रिकट घेतल्यानंतर बागेत पहिल्या वर्षी ही समस्या आढळून येते. यामध्ये लोह व मॅग्नेशिअमची कमतरता प्रामुख्याने दिसते. बागेत पाने पिवळी पडणे व पाण्याच्या कडा पिवळ्या पडणे या महत्त्वाच्या समस्या या वेळी बागेत आढळून येतात.
अन्नद्रव्यांच्या या कमतरतेमुळे बागेत वेल अशक्‍य होत असून, त्यानंतर वातावरणाचा समतोल बिघडला असल्यास रोगांचा प्रादुर्भाव जास्त वाढतो. यावर नियंत्रण ठेवण्याकरिता कमी प्रमाणात फेरस सल्फेट व मॅग्नेशिअम सल्फेटची शिफारशीत मात्रेमध्ये दोन ते तीन वेळा फवारणी करावी. त्याचसोबत जमिनीतूनसुद्धा या घटकांचा पुरवठा करावा.

जुनी बाग :
या बागेत काडी परिपक्व होत आहे. काडी तळातून दुधाळ रंगाची होत असताना काडी परिपक्वतेकडे वळली आहे, असे आपण म्हणतो. ही काडी परिपक्व होण्याच्या दृष्टीने तारेवर काड्या बांधून घेणे महत्त्वाचे समजावे. यामुळे कांड्यामध्ये गुंतागुंती होणार नाही, म्हणजेच मोकळी कॅनॉपी असेल तर त्यामध्ये हवा व सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात उपलब्ध होईल. कॅनॉपीमध्ये मिळालेले हे वातावरण काडीची परिपक्वता लवकर करून घेण्यास मदत करेल. त्याचप्रमाणे आर्द्रता कमी झाल्यास रोगांचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्‍यता कमी राहील.
या वेळी बागेत पावसाळी वातावरणामुळे नवीन फुटींची वाढ जास्त होताना दिसून येईल. ही फूट जास्त वाढल्यास अन्नद्रव्यांचा ऱ्हास होऊ शकतो. तेव्हा एकतर पालाशची पूर्तता करून काडी लवकर परिपक्व करून घ्यावी, म्हणजे वाढ थांबेल किंवा फुटी वेळीच काढून टाकाव्यात. यामुळे रोगावर नियंत्रण ठेवता येईल. जुन्या कॅनॉपीमध्ये भुरी रोगाचा जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो, तेव्हा या रोगावर वेळीच नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे राहील.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

शेतकर्‍याला गाय

“कोकणी शेतकर्‍याला गाय ही आपल्या देवी सारखी वाटतेच पण तो मुका प्राणी आपल्या आई सारखाही वाटत असतो. म्हणून जरी गाई म्हातार्‍या झाल्या आणि त्यांचा दुध देण्यासाठी काहीही उपयोग नाही असं जरी झालं तरी गाईंना आम्ही त्या मरेपर्यंत पोसतो.”
त्याचं असं झालं,आमच्या बिल्डींगच्या खाली धनाजी जाधवांचं फळाचं दुकान आहे हे धनाजी खंभिररावांचे धाकटे भाऊ.कोकणातून येणारा फळांचा आणि भाज्यांचा माल जाधव आपल्या दुकानात ठेवतात.आंब्या फणसाच्या मोसमात कोकणातून ट्रक भर-भरून माल आणून ह्या दुकानात विकला जातो.अलीकडे तर रोजच एक दोन ट्रकांची कोकणातून येण्या-जाण्यात फेरी होत असल्याने, चाफ्याची,आबोलीची,मोगर्‍याची ताजी फुलं,तसंच गणपतिच्या सणात कमळाची,आणि लाल रंगाची ताजी फुलं पण आणून ठेवतात. हार-वेण्या करण्यासाठी फुलं विकत घेण्यासाठी फुलवाल्यांची दुकानात रोजचीच गर्दी असते.
एकदा गप्पा मारत असताना जाधव मला म्हणाले,
“केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा मला सांगा.परतीच्या ट्रकात बसून आपण माझ्या बरोबर या. कोकणात जाऊंया. माझ्या भावाची छोटीशीच शेती आहे.तुम्हाला त्यांचं जीवन पहायला मजा येईल.”
आणि तो दिवस उजाडला.मी धनाजीबरोबर दोन चार दिवस रहायला त्यांच्या भावाच्या गावी गेलो होतो.
“आमच्या पूर्तिच शेती करायला मला आवडतं.मी आणि माझी बायको ह्या शेतावर मेहनत घेतो.आमच्या मेहनतीच्या पैशाने हे शेत आणि थोडी गुरं आम्ही विकत घेतली.हा सारा व्याप सांभाळताना आम्ही आमच्या दोन मुलांची जोपासना पण करीत असतो.”
खंभिरराव जाधव,मला माहिती देत होते.
दुसर्‍या दिवशी मी खंभिररावांच्या शेतावर फेरफटका मारायचं ठरवलं होतं.त्याशिवाय त्यांच्या गाईच्या दुधाच्या व्यवसायचं त्यांच्या भावाकडून ऐकलं होतं,त्याचंही कुतूहल माझ्या मनात होतं.ते पण पहाणार होतो.आणि वेळ मिळेल तेव्हा खंभिररावांशी गप्पा मारून माहिती काढायचं ठरवलं होतं.
शेतीची आणि त्याशिवाय दुधदुभत्याची कामं हाती घेतल्यावर ह्या व्यवसायात माणूस दिवसाचे चौविस तास व्यस्त असतो हे मला माहित होतं.
पण त्यांच्याच तोंडून ऐकण्यासाठी मी जाधवांना म्हणालो,
“हा शेतीचा धंदा असा आहे की तुमच्या रोजी-रोटीवर होत असणारे परिणाम बाह्य कारणावर अवलंबून असतात. आणि त्यावर तुमचं कसलही नियंत्रण नसतं.हवामान हा एक मोठा मुद्दा असतो.हे सर्व बाह्य परिणाम जेव्हा तुमच्या विरूद्ध जातात तेव्हा शेतीचा धंदा निमूट चालण्यात जास्त किफायतशीर असतो असं मी ऐकलं आहे ते खरं काय?”.
खंबिरराव हंसत हंसत मला म्हणाले,
“खूप थकायला होत असणार नाही काय?”
असं शेती न करणारी आमची मित्रमंडळी आम्हाला विचारतात.
माझं म्हणणं, खरंच थकायला होत असतं.
पहाटे चारला उठण्याचा प्रघात दिवसानी -दिवस ठेवावा लागतो.
पण यातही अभिमान वाटण्याची समाधानी आणि आमच्या स्वमेहनतीमुळे हे घडतंय हे पाहूनच आमचा मार्ग चाललेला असतो.”
मी म्हणालो,
“ह्या नकारात्मक वृत्तिने भरलेल्या समुद्रात शेती नकरणारे हे लक्षात का आणू शकत नाहीत हे कळायला जरा कठीणच जातं.”
“ह्या व्यवसायात फार मोठ्या प्रमाणात शेती असताना सहभाग घेणार्‍यांना खूपच कष्ट पडत असतील यात वाद नाही. परंतु,आम्ही सांभाळतो तसं छोटंसं शेत सांभाळण्याचा आनंद अवर्णनीय आहे. हा व्यवसाय एव्हडा हाडां-मासांत खिळलेला असतो की काहीतरी गोष्ट करीत राहाण्याशिवाय गत्यंतरच नसतं.हा व्यवसाय करताना पैशावर डोळा ठेऊन आम्ही करीत नाही.आंतरीक इच्छेमुळे आम्ही त्यात आहोत.”
खंभिररावानी आपलं प्रांजाळ मत दिलं.
“गाईच्या दुधाच्या व्यवसायाचा व्याप कसा असतो हो?”
मी खंभिररावांना लगेचच विचारलं.
“तेही तितकंच कटकटीचं असतं,पण कुठच्याही कामावर प्रेम असल्यानंतर त्याची कटकट भासत नाही.उलट उमेद येते.”
खंभिरराव सांगायला लागले.
“सकाळीच उठून गाईंच्या आंचूळ्या धूवून मग दूध काढताना दुधाच्या आठ-दहा चरव्या भरून निघाल्यावर संतुष्ट होण्यात इतकं समाधान वाटतं की काय सांगावं.ह्या गुरांना खाणं-पिणं व्यवस्थीत गेल्याने दुधाचा रतीब वाढतो. आपल्या आईचं दुध लुचून लुचून, पाडसं गुबगुबीत होतात.आणि वयात आल्यावर गाभण राहून मग विहिल्यानंतर परत दुधाच्या पुरवठ्यात भर टाकायला मदत करतात.
काही गाई भाकड झाल्यावर गुराख्याबरोबर माळावर चरायला पाठवल्यावर उरलेल्या दुभत्या गाई दुधाची उणीव भरून काढतात.”
भाकड गाईंबद्दल मला बर्‍याच शंका होत्या.आणि काही अपसमजही मी ऐकले होते.प्रत्यक्ष शेतकर्‍याच्या तोंडून “फ्रॉम हॉरसीस माऊथ” म्हणतात तसं होईल म्हणून मी जाधवांना विचारलं,
“ह्या भाकड गाई नंतर कसायाकडे दिल्या जातात, असं मी ऐकलं होतं.किती खरं आहे?”
“छे,छे! कुणी सांगीतलं तुम्हाला?”
माझ्या प्रश्नाने जाधव जरा वैतागल्या सारखे मला वाटले.
मला म्हणाले,
“कोकणातला शेतकरी हे पाप कधीच करणार नाही.गाईला देवी कशी मानली जाते.गाई भाकड झाल्या तरी काय झालं? ती गाईची तात्पुरती अवस्था असते.गुराख्याकडे भाकड म्हणून दिलेल्या गाई त्यांचा फळायचा मोसम आल्यावर त्या फळल्या जातात. एखाद दुसरी गाय सोडल्यास उरलेल्या गाई गाभण राहिल्या हे ऐकून पुढच्या मोसमात जादा दुधाच्या चरव्या भरणार ह्याचा विचार आमच्या मनात येऊन चार पैसे गाठीला जमतील मुलांना
दिवाळीत नवीन कपडे घेता येतील याची जाणीव होऊन आम्हा दोघां नवरा-बायकोना मेहनतीचं सार्थक होतंय हेच उलट तृप्तिचं कारण बनतं.”
असा प्रश्न का केला ह्याचा संदर्भ देताना मी जाधवांना म्हणालो,
“वांद्र्याला फार पूर्वी कसाईखाना होता.आता तो तिकडून उचकटून टाकला आहे.त्या दिवसात बाहेर गावाहून गुरांचा कळप मुंबईला कत्तल खान्यात घेऊन यायचे हे मी पाहलंय.ती गुरं कुठून यायची ह्याची कल्पना नाही.”
“त्या गुरांच्या कळपाचं मला काही माहित नाही.”
असं म्हणून खंभिरराव मोठ्या अभिमानाने आणि सद्गदीत होऊन सांगू लागले,
“कोकणी शेतकर्‍याला गाय ही आपल्या देवी सारखी वाटतेच पण तो मुका प्राणी आपल्या आई सारखाही वाटत असतो. म्हणून जरी गाई म्हातार्‍या झाल्या आणि त्यांचा दुध देण्यासाठी काहीही उपयोग नाही असं जरी झालं तरी गाईंना आम्ही त्या मरेपर्यंत पोसतो.
खाण्या पिण्यात त्यांची यत्किंचही आबाळ करीत नाही.आणि दुर्दैवाने त्या म्हातार्‍या गाई निर्वतल्या तरी आम्ही शेताच्या बाहेर माळरानावर खड्डा करून पुरतो.अक्षरशः घरातलं माणूस गेल्या सारखं शेतकर्‍याला दुःख होतं.दोन दिवस आम्ही उपास केल्यासारखे रहातो.त्यावर्षी आम्ही सणसोहळा सुद्धा करीत नाही.घरातली लहान मुलं सुद्धा दुर्मुखलेली रहातात.गेलेल्या गाईचं कातडं पायतानासाठी वापरायला महार-चांभार पूर्वी यायचे.पण पैशासाठी
म्हणून सुद्धा कोकणी शेतकरी गरीब झाला म्हणून ह्या मार्गाला जाणार नाही.”
चर्चा बरीच अशी भावूक होत आहे असं पाहून मी जरा विषय बदलण्याचा विचार करून जाधवांना म्हणालो,
“शेती कामात अवजारं वापरायची झाली म्हणजे त्यात दुरूस्थी-नादुरूस्थीच्या कटकटी आल्याच.पण ती अवजारं पुन्हा वापरण्याच्या स्थितीत आणल्यावर मनःशांती मिळते ती वेगळीच असते.तुम्हालाही तसं होत असेल नाही काय?”
“मनःशांती,आनंद,समाधानी आणि उत्कंठा असले प्रकार शेतकर्‍याच्या जीवनात येतच असतात.”
खंभिररावानाही मी विषय बदलल्याचं जाणवलं असावं.
मला म्हणाले,
“दोनचार कुंणग्यात भातशेती रोवून पिकं आल्यावर जमा केलेला तांदूळ गोण्या भरून मांगरात रचून ठेवायला आनंद होतो.शेती संपल्यावर त्याच जागेत मिरची,डांगर भोपळे,मुळा अशी भाजीची पिकं काढायला,आमचा आवर बेताचाच असल्याने मेहनत घ्यायला परवडतं.
कामं अजिबात न संपणार्‍या ह्या व्यवसायात काहीतरी संपादन केलं ह्याची समाधानी औरच असते.मग ते काम तांदळाची तूसं काढण्याचं असो किंवा गायरीतलं खत उपसून कुंणग्यात पसरवण्याचं असो, कशाचाही आधाराने, कोणतही काम त्या मोसमापुरतं झालं म्हणजे फत्ते.हवामान खात्याने दिलेलं भाकित खोटं ठरून येणारं वावटळीचं वादळ पुर्वेच्या दिशेने निघून गेल्याचं पाहून सुटकारा मिळाल्यावर मनही प्रफुल्लीत होतं.”
चर्चेचा शेवट आनंदात होतोय असं पाहून मी खंभिररावाना म्हणालो,
“आणि सर्वात उत्तम गोष्ट ही की तुमची मुलं रोज तुमच्या सहवासात असतात ह्याचं महत्व किती मोठं आहे.मेहनतीची फळं मिळाल्याचं पाहून त्यांना परिश्रमाची मुल्यं कळतात हे पाहून तुमचं समाधान होत असेल हे ही तितकंच महत्वाचं आहे.आणि तुमच्या मुलांच्या तोंडात आरोग्यजनक आणि पौष्टीक अन्न पडतं हे तुमच्या मेहनतीचं फळ आहे असं तुमच्या मुलांना वाटणं हे ही खूप समाधानाचं आहे.
अगदी खूश होऊन जाधव मला म्हणाले,
“म्हणूनच मला शेती आवडते.”
दुसर्‍या दिवशी आणि माझ्या पुर्‍या मुक्कामात मी,खंभिरराव आणि त्यांचे धाकटे बंधू धनाजी यांच्यासह मनसोक्त पाहूणचार घेतला हे सांगायला  नकोच.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

आधुनिक शेतकरी

आधुनिक शेतकरी आपल्या देशाची प्रगती झाली आहे. मोठमोठ्या परदेशी कंपन्यांनी आपला उत्कर्ष व भरभराट पाहून त्यांचा संसार इथेच थाटलाय. मोठ्या इमारती, मोठे पगार, मोठ्या गाड्या, सर्वकाही मोठ्या प्रमाणात होत आहे. माणसाला सुखसोयी, चांगली राहणी आणि खूप काही मिळत आहे. पण आज त्याच माणसाकडे थोडासाही वेळ उरला नाही.

शहरात राहत असलेल्यांना गावची ओढ नाही आणि ओढ असली तरी तिथे जायला वेळ नाही. त्यामुळे नव्या पिढीला गावचे घर, शेती, गोठे, गावाकडचे जेवण, प्रथा काहीच माहीत नाहीत. हिंदी सिनेमात हीरो-हिरॉईन शेतात नाचतात एवढाच संबंध या शहरातल्या मुलांचा शेताशी राहिला आहे. गंमत म्हणजे टी.व्ही.वरील एका कार्यक्रमात एका छोट्या मुलीला विचारले, ‘‘आपल्याला भात कुठून मिळतो?’’ तर तिने म्हटले बिग बाझार किंवा अपना बाझारमधून. त्यावर तिला हेही विचारले गेले की, त्या बाजारात कुठून येतो तर तिचे उत्तर होते ‘तिथेच बनवतात बहुतेक!’ पण यात या पिढीचा फारसा दोष नाही. जे पाहिलेच नाही ते कळेल तरी कसे. अन्न वाया घालवू नका असे सर्व पालक आपल्या मुलांना सांगतात, पण ते अन्न तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात किती क लागतात हे ज्यांना माहीतच नाही त्यांना अन्नाचे मोल कळेल तरी कसे. आणि मग यांनीच पुढे जाऊन शेतकर्‍यांची दु:खं समजावी अशी अपेक्षा करणे चुकीचेच नाही का? आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. शेतीमुळेच आपल्या देशाला मंदीचा जास्त फटका बसला नाही. त्यामुळे या पिढीच्या अज्ञानाकडे दुर्लक्षित करून चालणारच नाही. ‘‘पण मग काय करता येईल?’’ असा प्रश्‍न जर तुम्हाला पडला असेल तर एक फार आनंदाची गो सांगते, ‘‘ज्यांना गाव किंवा गावचे घर नाही, ज्यांना कांदा झाडाला लागतो की जमिनीतून येतो हे माहीत नाही, ज्यांना ‘आमची माती आमची माणसं’ हा कार्यक्रम का दाखवला जातो असा प्रश्‍न सतत पडतो, ज्यांना शेतकरी आत्महत्या का करतात माहीत नाही, ज्यांना शेतातल्या ताज्या भाज्या, शेतकरी किंवा शेतीशी काही संबंध नाही, त्यांना अज्ञानातून ज्ञानाकडे वळवण्याचे काम करत आहेत पांडुरंग तावरे. त्यांचे कार्य ऐकून तर पांडुरंगाने पंढरपुरातून बारामतीला ‘ट्रान्सफर’ घेतली असावी असेच मला वाटले.
पांडुरंग तावरे हे बारामतीचे रहिवासी व बी.एस.सी. (कॉम्प्युटर सायन्स)चे पदवीधर. त्यांची व त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी कृषिविषयक पदवी मिळवावी, पण कमी मार्क पडल्यामुळे तसे जमले नाही. शिक्षण झाल्यावर डेटा एण्ट्रीच्या कामाशिवाय दुसरे कोणतेही काम मिळत नव्हते. रु. ६०० दर महिना मिळकत. थोडा काळ गेल्यावर त्यांनी युरेका फोर्ब्समध्ये सेल्समनचे काम स्वीकारले. घरोघरी व्हॅक्युम क्लिनर व कूलर विकले. जवळजवळ तीन वर्षें सतत हीच रुपये ९५० ची नोकरी करून त्यांचे मन लागत नव्हते. २१ व्या वर्षी लग्न केले व स्टर्लिंग रिसॉर्टचे काम हाती घेतले. चार वर्षे तेथे काम केले. टूरिझमचा चांगला अनुभव इथूनच सुरू झाला. त्यानंतर क्लब महिंद्रामध्ये नोकरी केली. पुण्यातील वासेकॉन इंजिनीयर्समधील त्यांची शेवटची नोकरी. शेती करण्याचा जुना विचार सारखा मनात फिरत असतानाच नोकरी सोडायचे त्यांनी ठरवले. प्रागतिक शेतकरी होणे हे त्यांचे जुने स्वप्न होते. टूरिझमचा अनुभव आणि शेतीत अडकलेला जीव या दोन्हींचे मीलन कसे करावे या विचारात गुरफटलेले असतानाच त्यांना एक संकल्पना सुचली. त्या संकल्पनेचे नाव आहे ‘ऍग्री टूरिझम’. आपण सुट्ट्यांसाठी कश्मीर, केरळ, महाबळेश्‍वर, माथेरान किंवा परदेशात युरोप, अमेरिकेला जातोच. पर्यटन संस्था जे पॅकेज देतात त्यातले एखादे निवडतो. मग आपण गावाकडे त्याच सर्व सुविधा दिल्या व गावची माहिती दिली, जेवण, खेळ व नवीन अनुभव दिला तर यालाही पर्यटनच म्हणता येईल. असा जन्म झाला पांडुरंग तावरे यांच्या कृषी व ग्रामीण पर्यटनाचा. तावरे म्हणतात, ‘‘मातीची नाळ कधी तुटत नाही. मी याच मातीशी नव्याने ओळख करून देतो.’’ संकल्पनेचा संपूर्ण अभ्यास करून तावरेंनी शरद पवारांची भेट घेतली व त्यांची संकल्पना समजावत पवारांनी त्यांना विचारले, ‘‘इथे लोक गावचे जीवन बघायला येतील का?’’ त्यावर तावरेंनी ‘माझ्यावर विश्‍वास ठेवा’ एवढे म्हणून काम सुरू केले.
बारामती कृषी विकास प्रतिष्ठानच्या ११० एकर जागेवर या संकल्पना ऑक्टोबर २००५ मध्ये अमलात आणली. महिनाभर तयार्‍या, चाचण्या सर्व करून १ नोव्हेंबर २००५ मध्ये जाहीर केले. पुण्यात छान सजवलेल्या बैलगाड्यांवर बसून नटूनथटून मुलांनी व मुलींनी या संकल्पनेची माहिती देणारी पत्रके वाटली. तो देखावा पाहून उत्सुकता आधीच वाढली होती. लोकांची व त्यातून पत्रकातील माहिती वाचून तर सर्वच खूश झाले होते. संकल्पना अशी आहे की गावच्या शेतांवरील थोडा भाग वेगळा काढून चांगल्या खोल्या बांधल्या जातात. स्वच्छ राहण्याची सोय, गावाकडची चव व प्रेम जिभेला लावणारे जेवण, शेतात फिरण्याची संधी, शेती व अनेक प्रकारच्या उत्पन्नाची माहिती, गावचे खेळ बैलगाडीवर फेरफटका हे सर्व काही आपल्याला करता येते.
तावरेंनी मला विचारले, ‘‘तुम्ही कधी शेतात राहिला आहात का? पळून कोंबड्या पकडल्या आहेत का? भवरा खेळला आहात का? नाही ना मग सहकुटुंब या आणि हे अनुभव घ्या.’’ गावोगावी फिरून अनेक शेतकर्‍यांपर्यंत आज ही संकल्पना तावरेंनी पोहोचवली आहे. शेतीतून फारसे पैसे मिळत नसलेल्या शेतकर्‍यांसाठी हे कमाईचे दुसरे साधन ठरले आहे. एका वर्षात ४० हजार पर्यटक मालेगावमधील या कृषी पर्यटन स्थळाला भेट देऊन गेले. ‘‘शेतकरी म्हटले की अडाणी, बिनडोक असे आजही समजले जाते’’ असे ते सांगतात. शेतकर्‍यांच्या मुलांना लग्नाला मुली कुणी सहज देत नाही. पावसावर निर्भर राहणार्‍यांशी लग्न नको म्हणणार्‍यांनी ग्रामीण पर्यटन पाहून मत बदलले आहे. शेतकर्‍यांची मुले जी शहराकडे पळून जात होती ती आज शेतावर राहून ‘ऍग्रो टूरिझम’ करून घर चालवतात. प्रत्येक पर्यटकाचे पारंपरिक स्वागत केले जाते व त्यांना आपल्याच घरी आल्यासारखा अनुभव मिळतो. इथून गेलेला कुणीही भाजी मार्केटमध्ये कांदा-टोमॅटोचा भाव करणार नाही.

१५० शेतकर्‍यांना तावरेंनी हा उपक्रम सुरू करून दिला आहे. सोलापूरचे राजू असो किंवा मोरगावचे सुनील भोसले यांचे आयुष्य पांडुरंगाच्या कृपेनेच बदलले असे ते समजतात. पारंपरिक शेतीला कृषी व ग्रामीण पर्यटनाची जोड देऊन ग्रामीण विकासाला चालना देतानाच शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्याची संधी पांडुरंग तावरेंच्या कृषी पर्यटन विकास संस्थेमुळे काही वर्षांपासून मिळवून दिली. तावरेंना याच नावीन्यपूर्ण पर्यटन संकल्पनेसाठी रा्रीय पर्यटन पुरस्कार देण्यात आला. याच वर्षी हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी ‘१६ मे’ हा दिवस कृषी पर्यटन दिवस म्हणून जाहीर केला व त्यांनी दखल घेतल्यामुळे UNWT या संघटनेने या दिवसाला जागतिक मान्यता दिली आहे व जागतिक कृषी पर्यटन दिवस म्हणून जाहीर केले आहे. लहान मुलांचे व मोठ्यांचे कॅम्पवर आल्यावरचे प्रश्‍न ऐकून व त्याची उत्तरे त्यांना सविस्तरपणे देऊन त्यांनी ही संकल्पना सार्थकी लागल्यासारखी वाटते. देशातील ६५ कोटी पर्यटक आहेत व ३५ कोटी महारा्रातील आहेत असे सर्वेक्षण सांगते. या ३५ कोटींनी पहिला महारा्र पाहावा अशी तावरेंची इच्छा आहे. पांडुरंगभाऊ आपल्याला या कार्यात खूप यश मिळो. मुळात ही संकल्पना एवढी चित्तवेधक आहे की सर्वांना एकदा तरी हा अनुभव घ्यावा अशी इच्छा असेलच. या संकल्पनेची संपूर्ण माहिती आपल्याला तावरेजींच्या संकेतस्थळावर मिळेल.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

ख रीप हंगामाच्या पूर्वतयारी

ख रीप हंगामाच्या पूर्वतयारीमध्ये माती परीक्षण, जमिनीची पूर्वमशागत, बियाण्याची तरतूद, सेंद्रिय व रासायनिक खतांची त्याचप्रमाणे जिवाणू खतांची उपलब्धता करून ठेवणे, कीटकनाशकांची तसेच पेरणी अवजारे व हत्यारांची दुरुस्ती या बाबींचा समावेश होतो. जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेण्यासाठी माती परीक्षण उपयोगी ठरते. माती परीक्षणानुसार पिकास द्यावयाची खताची मात्रा निश्‍चित करता येते. जमिनीच्या पूर्वमशागतीमध्ये शेतात ढेकळे असल्यास ती बोड किंवा मैंदाच्या साह्याने फोडून घ्यावीत, जमिनीस उंच-सखलपणा असल्यास तिफणीने सपाट करावी. आडव्या-उभ्या कुळवाच्या पाळ्या द्याव्यात, शेवटच्या कुळवणीअगोदर शिफारशीप्रमाणे चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. जमिनीची बांधबंदिस्ती करून पूर्वीच्या पिकाची धसकटे वेचून शेत स्वच्छ करावे.

पीक उत्पादनवाढीसाठी संकरित व अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित वाणांचा महत्त्वाचा वाटा असल्याने पेरणीसाठी बियाण्याची निवड करताना जास्त उत्पादन देणाऱ्या, खतास चांगला प्रतिसाद देणाऱ्या, कमी कालावधीत व कमी पाण्यात येणाऱ्या तसेच रोग व किडीस प्रतिकारक्षम असणारे वाण निवडावेत. शक्‍यतो प्रमाणित बियाणे पेरणीसाठी वापरावे. बियाणे खरेदी करताना त्याची उत्पादन तारीख, शुद्धता, वाणाचे/ जातीचे नाव, उगवणक्षमता इत्यादी सर्व गोष्टी पाहूनच बियाणे खरेदी करावे. बियाणे अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करून त्याची पक्की पावती घ्यावी. विकत घेतलेल्या बियाण्याच्या पिशवीस असलेले लेबल व टॅग जपून ठेवावा, यदाकदाचित बियाण्यात काही दोष आढळल्यास बिल, लेबल व टॅगची संबंधितांकडे तक्रार करताना गरज पडते.

पीक पेरणीपूर्वी बीजप्रक्रियेसाठी पिकानुसार शिफारस केलेल्या जिवाणू खतांची खरेदी करून ठेवावी. ज्वारी, बाजरी, भात, मका या एकदल व तृणधान्ये पिकासाठी ऍझोटोबॅक्‍टर, शेंगवर्गीय द्विदल पिकासाठी रायझोबियम हे जिवाणू संवर्धक वापरावे. वेगवेगळ्या गटातील पिकांना विशिष्ट प्रकारचे रायझोबियम वापरावे. स्फुरद विरघळणारे जिवाणू तसेच ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाचा आवश्‍यकतेनुसार बीजप्रक्रियेसाठी वापर करावा.

पूर्वहंगामी कापूस लागवड ठिबक सिंचनावर केल्याने सोटमुळे जमिनीत खोलवर जाऊन पिकाची वाढ जोमदार होते, लवकर फुले येतात. पर्यायाने हा कापूस हंगामी कापसाच्या तुलनेत वेचणीसाठी 20 ते 25 दिवस लवकर तयार होतो आणि उत्पादनात भरीव वाढ होते.

पूर्वहंगामी कापूस पिकासाठी उष्ण, कोरडे व कमी आर्द्रतायुक्त हवामान मानवते. या काळात रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव अत्यंत कमी असतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्वहंगामी कापूस पीक 25 ते 30 दिवसांचे होऊन त्यास पाते लागण्यास सुरवात होते. ठिबक सिंचनावर आधारित पूर्वहंगामी कापसाची लागवड योग्य वेळी करता येते व या पिकास पाण्याचा कोणताही ताण बसत नाही. सर्वसाधारणपणे पाच अश्‍वशक्तीचा पंप ताशी 18 ते 21 हजार लिटर पाणी देतो. एवढ्या पाण्यावर कमीत कमी दोन ते अडीच एकर क्षेत्रावर पूर्वहंगामी कापसाची लागवड मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून ठिबक पद्धतीने करणे शक्‍य आहे.

जमिनीची निवड ः
मध्यम ते भारी, काळी, कसदार, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असावी. हलक्‍या, उथळ आणि पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत कपाशीची लागवड करण्याचे टाळावे.

पूर्वमशागत ः
एक खोल नांगरट व दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडावीत. आधीच्या पिकाची धसकटे, पाला व काडीकचरा गोळा करून तो जाळावा व शेत स्वच्छ करावे. शेवटाच्या कुळवाच्या पाळीअगोदर 15 ते 20 गाड्या कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.
ठिबक सिंचन संच उभारणी ः
पूर्वमशागत झाल्यावर शेताची पाहणी करून आराखडा तयार करावा. आराखड्याप्रमाणे ठिबक संचाची उभारणी करावी. पाण्याचा स्रोत आणि पाण्याच्या गुणवत्तेनुसार फिल्टरची निवड करावी. कापूस पिकासाठी ड्रीपरचा प्रवाह चार लिटर प्रति तास असलेल्या 12 किंवा 16 मि.मी. इनलाईन नळीची निवड करावी. इनलाईन नळीच्या दोन ड्रीपरमधील अंतर 60 सें.मी. किंवा 90 सें.मी. असावे. ठिबक सिंचन पद्धतीत जोडओळ पद्धत किंवा पट्टा पद्धतीचा अवलंब करावा, त्यामुळे प्रति हेक्‍टरी झाडांची संख्या कायम राहून खर्चात बचत होते, तसेच पीक फवारणी, आंतरमशागत व कापूस वेचणी ही कामे सोईस्कर राबविता येतात.
लागवड व्यवस्थापन ः
ठिबक सिंचन आधारित पूर्वहंगामी कापसाची लागवड करण्यासाठी अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जातींची निवड करावी. बी.टी. कापसाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या व जास्त फळफांद्या असणाऱ्या जातीची निवड करावी. लागवड करताना जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता, जाती इ. बाबींचा विचार करावा. लागवडीसाठी बियाणे लावण्यापूर्वी (पेरणीपूर्वी) 12 ते 14 तास ठिबक संच चालवून शेतात वाफसा होईपर्यंत ओलावा निर्माण करावा. नंतर शिफारस केलेल्या अंतरावर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 60 ते 120 ु 90 सें.मी. किंवा 90 ते 180 ु 105 ते 120 सें.मी. अशा अनेक जोडओळ किंवा पट्टा पद्धतीने ठिबक संचालगत लागवड करावी. लागवड करताना इनलाईन नळीचे ड्रीपर व बियाणे लागवडीची जागा जवळ येतील याची काळजी घ्यावी.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

उझी माशीचा प्रादुर्भाव

ढगाळ वातावरणामुळे रेशीम कीटकांवर उझी माशी या उपद्रवी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. साधारणपणे जून ते जानेवारी या महिन्यांत उझी माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. या माशीची माहिती व त्यावर करावयाच्या उपायांविषयी माहिती करून घेऊ.
उझी माशी ही उपद्रवी कीड असून, तिच्या प्रादुर्भावामुळे अनेक देशांमध्ये नुकसान होत असल्याचे दिसून येते. देशात कर्नाटकच्या शेजारील राज्ये आंध्र प्रदेश व तमिळनाडू या ठिकाणी सन 1981-82च्या दरम्यान या माशीचा प्रादुर्भाव व प्रसार झाला. गेल्या काही महिन्यांपासून काही जिल्ह्यांमध्ये उझी माशीचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात झालेली आहे. उझी माशीच्या प्रादुर्भावामुळे जवळपास 10 ते 30 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होऊ शकते. साधारणपणे जून ते जानेवारी या महिन्यांत उझी माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो.
या माशीच्या जीवनचक्रातील अंडी, मॅगट, प्युपा, माशी या चार अवस्था आहेत. नर उझी माशी मादी उझी माशीच्या तुलनेत आकाराने मोठी असते. पाठीवर गडद काळ्या रंगाचे चार उभे पट्टे असतात. ही माशी 300 ते 1000 पर्यंत अंडी घालू शकते. ही माशी शक्‍यतो चॉकी अवस्थेतील रेशीम कीटकांवर अंडी घालण्याचे टाळते, तर आकाराने मोठ्या असलेल्या प्रौढ रेशीम कीटकांना भक्ष्य बनवते. अंडे घातल्यापासून एक-दोन दिवसांत अंड्यातून मॅगट बाहेर येतो, ज्याचा रंग पिवळसर पांढरा असतो. मॅगट रेशीम कीटकाच्या नाजूक त्वचेला छिद्र पाडून कीटकाच्या शरीरात प्रवेश करतो. ज्या ठिकाणाहून तो प्रवेश करतो, त्या ठिकाणी काळ्या रंगाचा डाग दिसून येतो. परिपूर्ण वाढ झालेला क्रीम व्हाइट रंगाचा मॅगट संगोपनगृहातील रॅकमध्ये, जमिनीला असलेल्या भेगांमध्ये अथवा कीटक संगोपनगृहातील कोपऱ्यांमध्ये अंधाऱ्या जागी वाटचाल करतो. या ठिकाणी त्याची पुढील प्युपा अवस्था सुरू होते. प्युपा अवस्था 10 ते 12 दिवसांची असते. प्युपाचा आकार लंबगोलाकार/दंडाकृती असून, प्रौढ प्युपाचा रंग गडद तपकिरी असतो. या प्युपामधून मादीच्या तुलनेत नर उझी माशी अगोदर बाहेर येते. उझी माशीचा जीवनाचा कालावधी 17 ते 18 दिवसांचा असतो. या एकूण कालावधीपैकी चवथ्या ते सातव्या दिवसांपर्यंत मोठ्या प्रमाणात अंडी घालते. नर माशीपेक्षा मादी माशीचा जीवनकाल अधिक असतो. उझी माशी 1000 ते 2000 मीटरपर्यंत उडू शकते
नियंत्रण
भौतिक, रासायनिक व जैविक उपायांनी नियंत्रण करणे शक्‍य आहे.
भौतिक उपाय – कीटक संगोपनगृह, कोष खरेदीकेंद्र, अंडीपुंजनिर्मिती केंद्र, रेशीम धागानिर्मिती केंद्र इ. ठिकाणांवरील मॅगट व प्युपा गोळा करून जाळून नष्ट करावा किंवा 0.5 टक्के साबणाच्या द्रावणात नष्ट करावा. जमिनींना असलेल्या भेगा बुजवून घ्याव्यात. उझी माशीच्या प्रादुर्भावास बळी पडलेले रेशीम कीटक गोळा करून नष्ट करावेत.
पाचव्या अवस्थेतील रेशीम कीटकांस प्रादुर्भाव झाला असेल, तर असे प्रादुर्भावित रेशीम कीटक इतर रेशीम कीटकांच्या तुलनेत दोन दिवस अगोदर कोष बांधतात. असे कोष मॅगट बाहेर येण्यापूर्वीच गोळा करून त्यांवर कोष ड्राय करण्याची प्रक्रिया करावी, ज्यामुळे कोषातील मॅगट मरून जाईल व कोषांचे नुकसान होणार नाही. उझी माशीचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणावरून कोष, मॅगट, प्युपा येणार नाही याची खबरदारी घ्यावी. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेल्या गावांतील शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या एक-दीड महिना पीक बंद ठेवावे, ज्यामुळे उझी माशीच्या जीवनचक्रात निसर्गतःच अडथळा निर्माण होऊन तिच्या प्रसारावर नियंत्रण मिळविता येईल. कीटक संगोपनगृहाच्या खिडक्‍या व तावदाने इत्यादींना नायलॉन जाळीने झाकून घ्यावे, यामुळे जवळपास 20 ते 22 टक्के नियंत्रण मिळविता येते. चॉकी ट्रे, तसेच रॅक नायलॉन जाळीने झाकून ठेवावे, यामुळे उझी माशीला अंडी घालणे शक्‍य होणार नाही.
किडीची लक्षणे
रेशीम कीटकाच्या शरीरावर लहान एक ते दोन अंडी असणे किंवा रेशीम कीटकाच्या त्वचेवर काळ्या रंगाचा डाग असणे किंवा कोषाला छिद्र पाडून मॅगट बाहेर आलेला असणे.
उझी माशीचा प्रादुर्भाव रेशीम कीटकाच्या तिसऱ्या अवस्थेत झालेला असल्यास रेशीम कीटक कोषावस्थेपूर्वीच मृत होताना आढळतात, जर प्रादुर्भाव रेशीम कीटकाच्या पाचव्या अवस्थेत झालेला असेल, तर पोचट कोषांची निर्मिती होते. होणारे नुकसान 10 ते 30 टक्के असते.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

हरळीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी

संत्रा बागेत हरळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, नियंत्रणासाठी ग्लायफोसेटची फवारणी करावी का? काय काळजी घ्यावी?
परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ प्रा. आनंद गोरे यांनी दिलेली माहिती ः हरळी हे खूप काटक असे तण आहे. ते एकदा का शेतात वाढू लागले, की त्याचे नियंत्रण करणे अवघड होते. वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत असेल तर तणनाशकाने नियंत्रण होते; मात्र त्यानंतर शेतात पाणी दिले, की हरळी पुन्हा वाढू लागते. शेतात हरळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे. ग्लायफोसेट या तणनाशकाचा वापर करून या तणाचे नियंत्रण होऊ शकते; मात्र त्याचा वापर करताना योग्य ती काळजी घ्यावी. फवारणीपूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
फवारणीवेळी ही काळजी घ्या…
बागेत फवारणी करताना पंपाला हूड लावूनच फवारणी करावी. तणनाशक झाडाच्या जवळपास किंवा हिरव्या भागावर पडणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतात पाणथळ जागा राहणार नाही याकडे लक्ष द्यावे. तण हे लुसलुशीत व चार ते पाच पानांवर असावे. तणांच्या प्रादुर्भावानुसार हेक्‍टरी दोन ते चार लिटर ग्लायफोसेट प्रति 500-600 लिटर पाण्यातून फवारावे. फ्लॅट नोझलचा वापर करावा. फवारणी स्वच्छ सूर्यप्रकाशात करावी. ढगाळ वातावरणात करू नये. फवारणीनंतर 21 दिवसांपर्यंत शेताची मशागत करू नये. तणांच्या उगवणीपूर्वी बागेत ऍट्राझीन हे तणनाशक दीड ते तीन लिटर प्रति हेक्‍टरी फवारल्यास चांगले नियंत्रण मिळते.


कोणतीही कंपनी जेव्हा एखादे कीटकनाशक, बुरशीनाशक वा तणनाशक किंवा अन्य कोणतेही रसायन संशोधित करते त्या वेळी तेथील प्रयोगशाळेत त्याच्या चाचण्या घेऊन जे ज्या गोष्टीसाठी कार्य करते त्यासंबंधीची जैविक क्षमता तपासली जाते. याला इंग्रजीत बायो इफिकसी म्हणतात. मात्र या उत्पादनाची जैविक क्षमता केवळ प्रयोगशाळेपुरतीच नव्हे तर प्रत्यक्ष शेतातही तपासून सिद्ध व्हावी लागते. त्यासाठी विविध कृषी हवामान विभागांमध्ये व हंगामांमध्ये म्हणजे भारतात त्याच्या प्रायोगिक चाचण्या घ्याव्या लागतात. कृषी विद्यापीठे किंवा संशोधन केंद्रांतून या चाचण्या संबंधित कंपनीमार्फत घेतल्या जातात. त्याला “मल्टीलोकेशनल्स फील्ड ट्रायल्स’ असे म्हणतात. या चाचण्यांव्यतिरिक्त पशु-पक्षी, जलाशय, मासे, किंवा एकूणच पर्यावरणासाठी हे उत्पादन सुरक्षित आहे का त्यासंबंधीच्या किंवा त्याच्या विषारीपणाबाबतच्या चाचण्या घेतल्या जातात. त्यानंतर सर्व चाचण्यांचा हा अहवाल सीआयबीआरसीकडे सुपूर्त केला जातो. त्यानंतर या संस्थेमार्फत त्याचा अभ्यास होऊन कीडनाशकाच्या विक्रीला कायदेशीर वा अधिकृत मंजुरी दिली जाते. आता हे उत्पादन शेतकरी वापरणार असल्याने त्या उत्पादनाविषयी आवश्‍यक ती माहिती त्याच्या पॅकिंगवर किंवा बाटलीवर लिखित स्वरूपात छापणे अत्यावश्‍यक असते. त्याला लेबल असे म्हणतात. या लेबलमध्ये कोणती माहिती संबंधित कंपनीने देणे गरजेचे आहे त्याचे काही नियम वा निकष ठरवून दिलेले असतात. आता या कीडनाशकाची वा उत्पादनाची शिफारस ज्या पिकावरील ज्या किडीसाठी, ज्या मात्रेत (डोस) करण्यात आली आहे ती माहिती म्हणजेच लेबल क्‍लेम होय.
उत्पादनासोबत कंपनी एक छोटी घडीपत्रिका किंवा माहितीपत्रिका देते. त्यात हे लेबल क्‍लेम दिलेले असतात. (तुम्ही लीफलेट उघडून पाहा. त्यात कीडनाशकाचे नाव, सक्रिय घटक, कोणकोणत्या पिकांवर, कोणकोणत्या किडी-रोग वा तणांचे नियंत्रण), वापरण्याची मात्रा व डोस, पाणी याचा एक तक्ता वा कोष्टक दिलेले असते. ही माहिती म्हणजेच लेबल क्‍लेम.
उदा. कंपनीने या कोष्टकात आपल्या कार्बेन्डॅझीम या उत्पादनाचा (बुरशीनाशक) डोस भुईमुगावरील टिक्का रोगासाठी प्रति हेक्‍टरी प्रति 600 लिटर पाण्यासाठी 225 ग्रॅम आहे असे जेव्हा लिहिलेले असते त्याचा अर्थ भुईमूग पिकावर टिक्का रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझीम या बुरशीनाशकाचा लेबल क्‍लेम आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच विविध चाचण्यांतून पार पडल्यानंतर शास्त्रीय कसोटींवर आधारित सिद्ध झालेली किंवा करण्यात आलेली ही अधिकृत शिफारस होय. आता पॅकिंगवर लेबलच्या स्वरूपात जी माहिती कंपनी उपलब्ध करते त्याचे विस्तृत विवरण घडीपत्रिकेत असते. त्याला इंग्रजीत लीफलेट असे म्हणतात. प्रत्येक उत्पादनासोबत प्रत्येक कंपनी हे लिफलेट देते. पॅकिंगवरील माहितीवर कंपनीने असे लिहिलेलेच असते की अधिक माहितीसाठी लिफलेट वाचावे. मात्र अनेकवेळा बाटली एकीकडे, लीफलेट दुसरीकडे अशी विक्री केंद्रावर परिस्थिती असते. कोणत्याही परिस्थितीत बाटली किंवा उत्पादनाचा पुडा यासोबत दोन गोष्टी घेतल्याशिवाय शेतकऱ्याने दुकान सोडू नये. 1)खरेदीची पक्की पावती 2) लीफलेट (लेबलचे माहितीपत्रक वा घडीपत्रक)
लीफलेट घरी जाऊन सविस्तर वाचावे. अनेकवेळा लीफलेटवरील माहिती अत्यंत बारीक अक्षरात लिहिलेली असते, त्यामुळे ती डोळ्यांनी सहजासहजी वाचणे कठीण जाते. अशा वेळी चांगल्या दर्जाच्या भिंगाचा वापर करावा. शेतात किडींचे निरीक्षण करण्यासाठी आपल्याकडे भिंग असावेच लागते. त्याचा वापर करावा. लीफलेट कायम जपून ठेवावे. आपल्यासोबत अन्य शेतकऱ्यांनाही लेबल क्‍लेमचे महत्त्व समजावून द्यावे.
लेबल क्‍लेममुळे काय फायदे होतात?
शेतकऱ्याला त्या उत्पादनाच्या गुणवत्तेविषयी कायदेशीर हमी वा संरक्षण मिळते.
देशभरात विविध ठिकाणी (कृषी विद्यापीठे वा संशोधन संस्था) संबंधित कीडनाशकाच्या चाचण्या घेतलेल्या असतात. त्यामुळे सर्वत्र त्याची जैविक क्षमता तपासून मगच त्याची अधिकृतरीत्या ती शिफारस असते.
लेबल क्‍लेमद्वारे संबंधित कीडनाशकाची केवळ मात्रा, वापरण्याची वेळ निश्‍चित होते असे नाही, तर संबंधित पीक, मानव, पर्यावरण, मित्रकीटक, जनाव, जलाशय,मासे आदी घटकांवर कीडनाशकाच्या होणाऱ्या परिणामांच्या चाचण्या तपासलेल्या असतात. त्यानंतर ते सुरक्षित वापरासाठी घोषित करण्यात येते.
लेबल क्‍लेममधून “पीएचआय’ शेतकऱ्यांना समजून येतो. ज्यावरून पुढे “एमआरएल’ मिळवणे शक्‍य होते.
एखादे कीडनाशक वा कोणतेही रसायन आपण स्वतःच्याच निर्णयाने जर एखाद्या पिकावर वापरले तर त्याचा त्या पिकावर किंवा पाने, कळ्या, मोहोर, फळांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. लेबल क्‍लेम मिळालेल्या रसायनाच्या अशा चाचण्या घेतल्या असल्याने तो धोका टळला जाऊ शकतो.
लेबल क्‍लेममुळे एखाद्या रसायनाची चुकीची शिफारस करण्यास प्रतिबंध केला जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्याची दिशाभूल वा फसवणूक होणे टळू शकते.




  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सोयाबीन

सोयाबीनवर गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, नियंत्रणासाठी कोणते उपाय करावेत?

पावसाळा सुरू असल्याने या वातावरणात गोगलगायींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. गोगलगायी घास, द्राक्ष, वाल, कारली, भोपळा, काकडी, टोमॅटो, लसूण, मिरची, भुईमूग, भेंडी, फुलकोबी, सोयाबीन इत्यादी पिकांची रोपे कुरतडतात. पावसाळ्यात त्या चारीलगत, बांधालगत असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. अंड्यातून बाहेर आल्यानंतर सुरवातीच्या वाढीच्या काळात गोगलगायींचा खाण्याचा वेग जास्त असतो, त्यामुळे सुरवातीच्या काळात पिकांचे जास्त नुकसान करतात.
एकात्मिक नियंत्रणाचे उपाय -
1) शेतालगतचे बांध स्वच्छ करावे. 2) गोगलगायी दिसताच चिमट्याने अथवा हाताने गोळा करून उकळलेल्या पाण्यात टाकून माराव्यात. 3) संध्याकाळी शेतामध्ये ठराविक अंतरावर गवताचे ढीग ठेवावेत व सकाळी त्याखाली लपलेल्या गोगलगायी गोळा करून त्यांचा नाश करावा, तसेच पिकांच्या मुळाशेजारी गोगलगायींनी घातलेली पिवळसर पांढऱ्या रंगाची (100 ते 150च्या पुंजक्‍यात) साबुदाण्याच्या आकाराची अंडी गोळा करून नष्ट करावीत. 5) दहा लिटर पाण्यात एक किलो गूळ मिसळावा व त्या द्रावणात गोणपाटाची पोती भिजवून संध्याकाळी गोगलगायीग्रस्त शेतात ठराविक अंतरावर पसरावीत. गोगलगायी अशा पसरलेल्या पोत्यांखाली जमा होतात, सकाळ होताच त्यांचा वेचून नाश करावा. 6) सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा खड्ड्यात पुरून त्यावर चुन्याची भुकटी टाकावी. 7) जास्त उपद्रव असल्यास शेताभोवती दोन मीटर पट्ट्यात राख पसरून त्यावर मोरचूद आणि कळीचा चुना 2ः3 या प्रमाणात मिसळून त्याचा पातळ थर राखेवर द्यावा किंवा बांधाच्या शेजारी तंबाखू अगर चुन्याच्या भुकटीचा चार इंच पट्टा टाकावा, त्यामुळे गोगलगायींना शेतात येण्यापासून अटकाव करता येईल. पाऊस पडत असल्यास या पद्धतीचा उपयोग होत नाही. 8) मेटाल्डीहाईड कीडनाशकाच्या गोळ्या बाजारात उपलब्ध आहेत. प्रादुर्भाव असलेल्या शेतात संध्याकाळच्या वेळी पाच किलो प्रति हेक्‍टरी या प्रमाणात शेतात टाकल्यास, त्या खाऊन गोगलगायी मरतात. 9) विषारी आमिष देऊनही गोगलगायी मारता येतात, त्यासाठी गव्हाचा किंवा भाताचा 50 किलो कोंडा दोन किलो गुळाच्या द्रावणामध्ये 10 ते 12 तास भिजवून ठेवावा. त्यामध्ये 25 ग्रॅम यीस्ट मिसळावे. या मिश्रणात मिथोमिल कीटकनाशकाची 50 ग्रॅम भुकटी मिसळून संध्याकाळी प्रादुर्भाव ग्रस्त क्षेत्रात प्रति हेक्‍टरी पसरून टाकावे. मिथोमिल हे
विषारी कीटकनाशक असल्यामुळे त्याचा वापर करताना प्लॅस्टिकचे हातमोजे घालावेत आणि नाका-तोंडावर कापड बांधावे. हे आमिष जनावरे व पाळीव प्राणी खाणार नाहीत याची काळजी घ्यावी. 10) सामूहिक प्रयत्न केल्यास प्रभावी नियंत्रण होते.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

कापूस

कापूस पिकाला ठिबक संचाद्वारे पाणी व खते दिल्याने दोन्हींच्या खर्चात मोठी बचत होते. पिकाला गरजेनुसार पाणी देता येते. तसेच फर्टिगेशन पद्धतीने विद्राव्य खतांचा वापर करता येतो. ठिबक संचाची शेतात उभारणी करण्यापूर्वी त्यास आवश्‍यक त्या घटकांची पूर्तता करून खत व पाणी देण्याचे योग्य नियोजन करावे.

ठिबक संच शेतात उभारण्यापूर्वी पुढील आवश्‍यक घटकांची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे.

पूर्वमशागत ः संच उभारणीपूर्वी जमिनीची पूर्वमशागत करावी. उभी/ आडवी नांगरट व वखराच्या पाळ्याद्वारे जमीन भुसभुशीत करावी. भुसभुशीत जमिनीत ठिबक सिंचनाचे पाणी योग्य रीतीने पसरते. कापूस लागवडीच्या अंतरानुसार ठिबक सिंचन संचाचा आराखडा व उभारणी करावी. ठिबक सिंचन संचाची निवड करताना तडजोड करू नये. संचामध्ये नळ्यांव्यतिरिक्त फिल्टर व प्रेशर गेज हे महत्त्वाचे घटक जरूर जोडावेत.

फिल्टर अतिशय महत्त्वाचा ः इनलाईन ठिबक नळ्या तयार होत असतानाच त्यांच्या आत ठिबक तोट्या बसविलेल्या असतात, त्यामुळे इनलाईन नळ्या वरून स्वच्छ करता येत नाहीत म्हणून या पद्धतीत फिल्टरची निवड जास्त महत्त्वाची असते. सर्वसाधारणपणे जाळीचा फिल्टर हा सर्वच संचामध्ये बसविलेला असतो, मात्र पाण्याच्या गुणवत्तेनुसार इतरही फिल्टर बसविणे आवश्‍यक असते. विहिरीचे व बोअरचे पाणी असेल व कचऱ्याचे प्रमाण कमी असेल तर जाळीचा फिल्टर बसवावा. पाण्यामध्ये शेवाळे व तरंगणारे पदार्थ असतील, साचलेले पाणी असेल, तलावातील किंवा उघड्या शेततळ्यातील पाणी वापरायचे असल्यास वाळूचा फिल्टर असणे अत्यंत आवश्‍यक आहे, अन्यथा जाळीचा फिल्टर वारंवार चोक होऊन पाण्याचा पुरेसा प्रवाह संचास मिळत नाही. पाण्यातून वाळूचे, मातीचे, रेतीचे कण येत असल्यास हे कण संचात जाऊन ठिबक तोट्या बंद पडू शकतात. जुन्या बोअरवेल किंवा नवीन खोदलेल्या विहिरीतील पाण्याद्वारे असे कण येत असतात. यासाठी हायड्रोसायक्‍लॉन फिल्टर वापरावा. या फिल्टरद्वारे वाळूचे कण जास्त घनता असल्यामुळे पाण्याच्या वेगाने फिल्टरच्या बाहेर भिंतीकडे फेकले जाऊन तळाशी जमा होतात. नंतर हे कण वेगळे काढता येतात. सिंचनाच्या पाण्यात घनपदार्थ, सेंद्रिय पदार्थ व विरघळलेले क्षार कमी प्रमाणात, परंतु एकत्रितपणे असल्यास डिस्क फिल्टरची निवड करावी. या फिल्टरमध्ये प्लॅस्टिकच्या चकत्या एका नळीवर एकमेकांना चिकटून बसविलेल्या असतात. या चकत्यांवर बारीक खाचा असतात. फिल्टरमध्ये शिरलेले पाणी दोन चकत्यांमधील खाचांतून स्वच्छ होऊन बाहेर पडते. पाण्याच्या गुणवत्तेनुसार गरज पडल्यास दोन वेगवेगळे फिल्टर (उदा. ः जाळीचा व वाळूचा) एकत्रितपणे संचास बसविणे फायद्याचे असते.

प्रेशर गेज आवश्‍यक ः
प्रत्येक शेतकऱ्याने प्रेशर गेज (दाबमापक) घेणे आवश्‍यक आहे. संचामध्ये कमीत कमी दोन प्रेशर गेज असावे. एक प्रेशर गेज मुख्य पाइपलाइनवर फिल्टरच्या पूर्वी व दुसरा फिल्टरच्या नंतर बसवावा. संचाच्या आखणीनुसार संच किती दाबावर चालवायचा, फिल्टर केव्हा स्वच्छ करायचा, व्हेंचुरीद्वारे खत मिश्रित पाणी किती सोडायचे यासाठी प्रेशर गेज असण्याची गरज आहे.

इनलाईन नळ्या, ड्रीपर्सची निवड ः
संच योग्य दाबावर (साधारणत: एक कि. ग्रॅ./ वर्ग सें.मी.) सुरू नसल्यास पाण्याचे वितरण समान होत नाही व संच चालविण्याचा कालावधी ठरविल्यास त्यात चुका होऊ शकतात. ठिबक संचातील इनलाईन नळ्यांची निवड काळजीपूर्वक करावी. या नळ्या १२ मि.मी. व १६ मि.मी. मध्ये उपलब्ध आहेत. १२ मि.मी. व्यासाची इनलाईन नळी स्वस्त असते; परंतु तिची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी असते. या नळ्या वापरल्यास सबमेनवरील खर्चात वाढ होते, त्यामुळे शेताच्या आराखड्यानुसार दोन्ही प्रकारच्या (१२/१६ मि.मी.) नळ्यांद्वारे होणाऱ्या खर्चाची तुलना करून व त्याचा समन्वय साधूनच त्यांची निवड करावी. दोन ड्रीपर्समधील अंतर जमिनीच्या प्रकारानुसार निवडावे, कापसासाठी मध्यम जमिनीत दोन तोट्यांमधील अंतर ६० सें.मी. असते. तोट्यांतून बाहेर पडणारा प्रवाह साधारणत: २.२ ते ४.० लिटर प्रति तास असतो. विजेची उपलब्धता कमी वेळ असल्यामुळे अधिक प्रवाहाच्या तोट्या उपयुक्त ठरतात, यामुळे संच चालविण्याचा कालावधी कमी होतो.

लक्षात घ्या कापसाची पाण्याची गरज ः
बीटी कापसास पावसाच्या खंडाच्या दरम्यान एक किंवा दोन दिवसाआड ठिबकने पाणी द्यावे. पाणी देताना त्या दोन-तीन दिवसांचे एकत्रित बाष्पीभवन जितके असेल त्याच्या ५० टक्के इतक्‍या खोलीचे पाणी द्यावे. प्रत्येक ठिबक तोटीद्वारे किती लिटर पाणी द्यायचे हे काढण्यासाठी त्या तोटीद्वारे किती क्षेत्र भिजवायचे आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. लागवडीनंतर सुरवातीच्या काळात झाडाच्या जवळचे क्षेत्रच भिजवायचे असल्यामुळे या वेळी पाण्याची गरज कमी असते.

समजा लागवडीतील अंतर ६० १२० सें.मी. इतके असेल तर प्रत्येक झाडाने व्यापलेले क्षेत्र ०.७२ चौ. मीटर इतके होईल. प्रत्येक झाडास एक तोटी दिलेली असल्यास व एकत्रित बाष्पीभवन आठ मि.मी. असल्यास प्रत्येक झाडास साधारण तीन लिटर पाणी दोन दिवसांनी द्यावे लागेल. ठिबकची तोटी चार लिटर प्रति तास प्रवाहाची असल्यास संच ४५ मिनिटे चालवावा लागेल. याप्रमाणे लागवडीचे अंतर व नळ्याची व ठिबक तोट्यांची मांडणी यानुसार संच चालविण्याचा कालावधी काढून संचाचे नियमन करता येईल. कापूस पिकाला हवामानानुसार सहा महिन्यांच्या कालावधीत ८०० ते ९०० मि.मी. पाण्याची गरज असते. कापसाच्या हंगामात या कालावधीत साधारण ४५० ते ५५० मि.मी. उपयुक्त पावसाची नोंद होते. त्यामुळे उरलेले ३०० ते ४०० मि.मी. पाणी ठिबक सिंचनाद्वारे द्यावे लागेल. बऱ्याचदा हंगामानंतरही काही बोंडे हिरवी असल्यामुळे पीक राखले जाते. अशावेळी झाडावरील बोंडांची संख्या, त्यापासून मिळणारे उत्पादन, कापूस वेचण्यासाठी मजुरांची उपलब्धता व कापसाचा बाजारभाव इ. बाबींचा विचार करून पीक सांभाळावे. अशावेळी ठिबकद्वारे उर्वरित हंगामासाठीही बोंडे भरण्यासाठी पाणी देणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात पाणी कमी असल्यास बागायती बीटी कापसाची लागवड मे महिन्यात न करता २० जूनपर्यंत केली तरी फायद्याचे ठरते.

खत व्यवस्थापन :
बीटी कापसाला साधारणपणे १००:५०:५० किलो प्रति हेक्‍टरी नत्र, स्फुरद व पालाशचा वापर करावा. पिकाच्या हंगामाचा कालावधी लांबणार असल्यास (१८० दिवसांपेक्षा जास्त) यामध्ये ३० ते ५० टक्के वाढ करावी. याशिवाय हंगामापूर्वी मातीची तपासणी करून मातीत उपलब्ध अन्नद्रव्यांच्या प्रमाणात वरील मात्रेमध्ये गरजेनुसार बदल करावा. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असल्यास आवश्‍यकतेनुसार त्यांचा वापर करावा. साधारणत: ६० ते ७० दिवसांनंतर मॅग्नेशिअम सल्फेट २५ ते ४० किलो प्रति हेक्‍टर या प्रमाणात वापर करावा. लागवडीपूर्वी उपलब्धतेनुसार शेवटच्या पाळीपूर्वी कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. प्रवाही सिंचन पद्धतीने पाणी द्यायचे असल्यास तक्ता क्र. १ प्रमाणे खतांचे वेळापत्रक ठरवावे.

ठिबकद्वारे खते देण्याचे तंत्र ः
ठिबक संचाद्वारे खते देणेच जास्त योग्य असते. या प्रक्रियेस फर्टिगेशन म्हणतात. खते देण्यासाठी व्हेंचुरीचा वापर जास्त सोयीचा आहे. खतमिश्रित पाण्यात व्हेंचुरीचे एक टोक सोडून दुसरे टोक मुख्य पाइपला जोडले जाते व मुख्य पाइपवरील व्हॉल्व्हच्या साहाय्याने खतामधील पाणी मुख्य प्रवाहात सोडता येते. पाण्यात विरघळणारी सर्व खते या प्रक्रियेने पिकांना देता येतात. यासाठी संचासोबत व्हेंचुरी व बायपास असेंब्ली व्हॉल्व्हसह घेण्यासाठी दोन ते पाच हजार रुपये खर्च येतो.

ठिबक सिंचनाद्वारे पाणी व खतांची वापर कार्यक्षमता वाढविण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर करणे अधिक फायद्याचे आहे. विद्राव्य खते उपलब्ध होत नसल्यास पारंपरिक खतांपैकी युरिया, पांढरा पोटॅश किंवा चांगल्या प्रतीचा म्युरेट ऑफ पोटॅश पाण्यात संपूर्ण विरघळत असल्यामुळे ठिबक संचातून द्यावा. ठिबकद्वारे खतांची मात्रा अनेक वेळा विभागून देता येते. खते एक दिवसाआड देणे शक्‍य नसल्यास, आठवड्यातून / पंधरवड्यातून एकदा द्यावे. यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होऊन दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते. तक्ता क्र. २ मध्ये विद्राव्य खतांचे कापसासाठीचे वेळापत्रक दिलेले आहे. पिकाची कालावधी १८० दिवसांपेक्षा जास्त असल्यास १३५ दिवसांपर्यंत खते देण्यासाठी खतांच्या मात्रेत २० ते ३० टक्के वाढ करावी.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

पीक विमा

पीक विमा एक जबाबदार तत्व :
पीक विमामध्ये अंतर्भूत मूलभूत तत्व हे आहे की, क्षेत्रा मध्ये पुष्कळ लोकांद्वारे काही लोकांद्वारे झालेले नुकसान वाटून घेण्यात येते. तसेच साधन संपत्ति द्वारे अहितकारक भरपाई मध्ये झालेले नुकसान चांगल्या वर्षामध्ये संचित करण्यात येते.
सर्वसाधारणपणे पीक विम्याचे तत्व खालील रूपात स्पष्ट करण्यात येऊ शकेल :-
१          व्यक्तिगत शेतक-यांद्वारे  सामना केलेली अनिश्चितता मोठ्या प्रमाणात त्यांच्या सहयोगा मार्फत विमाकाराला हस्तांतरित करता येईल, ज्याच्या लाभाकरिता, विमेदार शेतकरी एक जोखीम विम्याचा हप्ता भरणा करतील.
२         एका विशाल क्षेत्रावर अर्थात एका विशाल क्षेत्रावर जोखमींचा समस्तर प्रसार व पुष्कळ वर्षांचा जोखमींचा उभा प्रसार, शेतक-यांच्या सहयोगाने एकूण नुकसान वाटून घेण्यात येते.
३         विमेदारा द्वारे गृहीत जोखीम विम्याचा हप्ता समूह जोखीम प्रतिबिंबित करतो. जेव्हा त्याच्या नियंत्रणा बाहेर कारणे गेल्यामुळे नुकासन होते, तेव्हा शेतक-याला क्षतिपूर्तिचा भरणा करण्याची जबाबदारी आहे, या अटीवर की, त्याने कसूर न करता विम्याच्या हप्त्याच्या भरण्याद्वारे वैध विमा कंत्राट चालू ठेवले आहे. भारतात पीक विम्याचा इतिहास :
भारतात पीक विमा योजनाः
भारतात शेतीला उत्तेजन देण्याच्या हेतूने, काही प्रायोगिक पीक विमा योजना देशामध्ये सुरु करण्यात आल्या आहेतः
दर्शी पीक विमा योजना:
ही योजना वर्ष 1979 पासून जीआयसी द्वारे सुरु करणअयात आली होती. ही योजना “क्षेत्राकडे जाणे” वर आधारित होती. ही योजना ऐच्छिक आधारावर व फक्त ऋणको शेतक-यांकरिता परिरूद्ध होती. ही योजना पीके उदा. तृणधान्ये, कनिष्ठ तृणधान्ये, गळित धान्ये, कापूस, बटाटा व हरभरा इत्यादी समाविष्ट करते. जोखीम 2:1 च्या गुणोत्तरामध्ये भारतीय साधारण विमा निगम व राज्य सरकारां दरम्याने वाटून घेण्यात येत होती. अधिकतम रक्कम, जी योजने अंतर्गत विमाकृत करण्यात येणार होती, ती पीक कर्जाच्या 100% होती, जी नंतर 150% पर्यंत वाढविण्यात आली होती. ह्या योजने अंतर्गत, अर्थसहाय्याचा 50% हिस्सा विमा प्रभारांकरिता तरतूद केलेला होता, जो 50:50 आधारावर भारत सरकार व राज्य सरकार द्वारे लहान/किरकोळ शेतक-यांना देय होता.
व्यापक पीक विमा योजना:
भारत सरकारने 1 एप्रिल 1985 पासून प्रभावी व्यापक पीक विमा योजना सुरु केली होती. ही योजना राज्य सरकारांच्या प्रत्यक्ष सहयोगा सोबत सुरु करण्यात आली होती. योजना राज्य सरकारांकरिता वैकल्पिक होती.
१. ही योजना लघु अवधि पीक उधाराशी संबद्ध होती, जी शेतक-यां करिता विस्तारित करण्यात आली होती व एक जिनसी क्षेत्र दृष्टिकोणाचा उपयोग करुन कार्यान्वित करण्यात आली होती. राज्यांची संख्या, ज्यांचा समावेश ह्या योजने अंतर्गत करण्यात आला होता, ती 15 राज्ये होती.

२. ही योजना खरीप 1999 पर्यंत कार्यान्वित होती. अनिवार्य आधारावर खाद्य पीके व गळित धान्ये पिकविण्या करिता वित्तीय संस्थांकडून पीक कर्जांचा उपयोग करून शेतक-यांना एक आसरा देणे इत्यादी ह्या योजनेची काही महत्वपूर्ण वैशिष्टये आहेत. ह्या योजने अंतर्गत व्याप्तिक्षेत्र प्रत्येक शेतकरी अधिकतम रु. 10,000/- च्या रक्कमे अधीन पीक कर्जाच्या 100% हिस्स्या करिता निर्बंधित होते. विमा हप्त्याचे दर तृणधान्ये व कनिष्ठ तृणधान्यां करिता 2% व डाळी व गळित धान्यांकरिता 5% होते. विमा हप्ता व जोखीम दावे केंद्र व राज्य सरकार द्वारे 2:1 च्या गुणोत्तरामध्ये वाटून घेण्यात येत होते. योजना राज्य सरकाराकरिता वैकल्पिक होती.
भारतात पीक विमा कंपन्या:
भारतीय कृषि विमा कंपनी मर्या. (एआयसीआय) द्वारा प्रवर्तित:
१          साधारण विमा कंपनी (जीआयसी)
२         कृषि व ग्रामीण विकासाकरिता राष्ट्रीय बॅंक (नाबार्ड)
इतर चार विमा उपकंपन्या आहेत:
१     नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि..
२         न्यू इंडिया अशुअरन्स कंपनी लि.
३         ओरीएंटल इन्शुरन्स कंपनी लि.
४        युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
बीएएसआयएक्सच्या सहकार्याने आयसीआयसीआय लोम्बार्डने पहिल्यांदा हवामान विम्याची तरतूद केली आहे. इफ्को टोकीयोने अलिकडेच हवामान विमा व्यवसायामध्ये प्रवेश केला आहे.


राष्ट्रीय कृषि विमा योजना (पीक विमा)

राष्ट्रीय कृषि विमा योजना (एनएआयएस) देशामध्ये रबी 1999-2000 पासून भारत सरकार द्वारे सुरू करण्यात आली होती. आमच्या राज्यामध्ये ही योजना कृषि विभाग, कृषि विमा कंपनी (कार्यान्वयन एजंसी) आणि आर्थिक व सांख्यिकी संचालनालयाच्या गोवणूकी सोबत खरीप 2000 हंगामापासून सुरु करण्यात आली आहे. राज्यामध्ये ही योजना जिल्हा सहकारी केंद्रीय बॅंका, ग्रामीण बॅंका, वाणिज्यिक बॅंका व प्राथमिक कृषि सहकारी संस्थांच्या प्रत्यक्ष सहयोगाने व गोवणूकीने कार्यान्वित करण्यात आली आहे.
उद्दिष्टे:-
  • अवर्षण, चक्रीवादळ आणि कीटक व रोग इत्यादीचा आपात यामुळे पीक वाया गेले तर शेतक-यांकरिता एका वित्तीय आधाराच्या उपायाची तरतूद करणे.
  • पुढील हंगामाकरिता एका पीक अपयशानंतर एका शेतक-याची उधार पात्रता पूर्ववत करणे.
  • शेती मध्ये प्रगतिशील शेती करण्याचे उपयोजन, उच्च मूल्य निविष्टि व उच्चतम तंत्रशास्त्र अंगीकारण्याकरिता शेतक-यांना उत्तेजन देणे.
  • शेती उत्पन्नात स्थैर्य आणण्या करिता मदत करणे, मुख्यतः आपात वर्षांमध्ये.
पीक संरक्षण:-
खरीप 2008 दरम्याने, वीस पीके संरक्षित करण्यात येतील उदा. 1. भात, 2. जवार, 3. बाजरा, 4. मका, 5. काळा हरभरा, 6. हीरवा हरभरा, 7. लाल हरभरा, 8. सोयाबीन, 9. भुईमूग (आय), 10. भुईमूग (युआय), 11. सूर्यफूल, 12. एरंडेल, 13. ऊस (पी), 14. ऊस (आर), 15. कापूस (आय), 16. कापूस (युआय), 17. मिरची (आय), 18. मिरची (युआय), 19. केळी, 20. हळद.

रबी 2007-08 दरम्याने, अकरा पीके संरक्षित करण्यात आली होती उदा. 1. भात, 2. जवार (युआय), 3. मका, 4. हिरवा हरभरा, 5. काळा हरभरा, 6. भुईमूग, 7. सूर्यफूल, 8. मिरची, 9. कांदा, 10. आंबा, 11. बेंगाल हरभरा.

राज्य अनुसार पीकांचे संरक्षण
राज्य संरक्षित क्षेत्र (हेक्टर मध्ये) संरक्षित पीके
आंध्र प्रदेश 3648680.76 भात, जवार, बाजरा, मका, रगी, काळा हरभरा, हिरवा हरभरा, लाल हरभरा, भुईमूग (आय), भुईमूग (युआय), एरंडेल, सूर्यफूल, कापूस (आय), कापूस (युएन आय), ऊस (पी), ऊस, मिरची (आय), मिरची (युआय), केळी, सोयाबीन, लाल मिरची, कांदा
आसाम 13068.80 आहू भात, साली भात, ताग, बोरो भात, गहू, रेइप व मोहरी, बटाटा, ऊस
बिहार 839012.71 भात, मका, मिरची, गहू, चणा, मसुर, अरहर, रेइप व मोहरी, बटाटा, कांदा, ऊस, ताग
छत्तीसगड 1375145.37 भात (युआय), कोडो कुटकी, भात (आय), सोयाबीन, भुईमूग, अरहर, जवार, तीळ, मका, गहू (युआय), गहु (आयआरआर), बेंगाल हरभरा, रेइप व मोहरी, जवस, बटाटा
गोवा 606.79 भात, रगी, भुईमूग, ऊस, डाळी
गुजरात 1896094.18 बाजरा, मका, काळा हरभरा, हिरवा हरभरा, तूर, केळी, भुईमूग, रगी, एरंडेल, मॉथ (पतंग), तीळ, कापूस, गहू (आय), गहू (युआय) रेइग व मोहरी, हरभरा, बटाटा, एस भुईमूग, एस बाजरा, जिरे, इझाबगोल, लसूण, कांदा
हरियाणा 71262.78 बाजरा, मका, कापूस, अरहर, हरभरा, मोहरी
हिमाचल प्रदेश 20250.44 भात, मका, बटाटा, गहू, सातू
जम्मू व काश्मीर 7588.61 भात, मका, गहू (आय), गहू (युआय), मोहरी
झारखंड 517036.32 भात, मका, बटाटा, गहू, रेइप व मोहरी, बेंगाल हरभरा
कर्णाटक 2692781.22 भात (आय), भात (आरएफ), जवार (आय), जवार (आरएफ), बाजरा (आय), बाजरा (आरएफ), मका (आय), मका (आरएफ), रगी (आय), रगी (आरएफ), नवाने (आरएफ), सावे (आरएफ), तूर (आय), तूर (आरएफ), काळा हरभरा, हिरवा हरभरा (आरएफ), घोड्याचे चणे, भुईमूग (आय), भुईमूग (आरएफ), सूर्यफूल (आय), सूर्यफूल (आरएफ), सोयाबीन (आय), सोयाबीन (आरएफ), तीळ (आरएफ), एरंडेल (आरएफ), बटाटा (आय), बटाटा (आरएफ), कांदा (आय), कांदा  (आरएफ), कापूस (आय), कापूस (आरएफ), मिरची (आय), मिरची  (आरएफ), गहू (आय), गहू (आरएफ), बेंगाल हरभरा (आय), बेंगाल हरभरा (आरएफ), केशरफूल (सॅफ फ्लॉवर) (आरएफ), केशर फूल (आय), जवस
केरळ 24590.84 भात, टॅपिओक, अननस, हळद, आले, केळी
मध्य प्रदेश 4548265.74 भात (आय), भात (युएन), जवार, बाजरा, मका, कोडो कुटकी, तूर, भुईमूग, तीळ, सोयाबीन, कापूस, केळी, गहू (आय), गहू (युएन), बेंगाल हरभरा, रेइप व मोहरी, बटाटा, कांदा
महाराष्ट्र 1314168.56 भात, जवार, बाजरा, मका, रगी, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, तीळ, नीगर, तूर, उडीद, मूग, कापूस, कांदा, ऊस, गहू (आय), गहू (युएन), जवार (आय), जवार (युएन), बेंगाल हरभरा, केशरफूल
मेघालय 4092.18 आहू भात, साली भात, बोरो भात, आले, बटाटा, रेइप व मोहरी
ओरीसा 1089845.97 भात, मका, भुईमूग, लाल हरभरा, नीगर, कापूस, मोहरी, बटाटा, ऊस
राजस्थान 5702717.89 भात, जवार, बाजरा, मका, मूग, मॉथ (पतंग), उडीद, भुईमूग, गाय वाटाणा (कावपिया), सोयाबीन, अरहर, तीळ, एरंडेल, गवार, गहू, सातू, हरभरा, मोहरी, तारामीरा, मसुर, धणा, जिरे, मेथी, इझाबगोल, सोन्फ
सिक्कीम 20.43 सोयाबीन, फिंगर मिलिट (बाजरी-ज्वारी इ. धान्ये), मका, अमान भात, आले, बटाटा, सातू, उडीद, मोहरी, गहू
तामीळनाडू 440005.64 भात, रगी (युआय), रगी (आय), मका (आरएफ), भुईमूग (आय), कापूस (युआय), कापूस (आयआरआर), कापूस (तांदूळ सोबती), टॅपिओक, बटाटा, कांदा, हळद, केळी, मिरची, आले, घोड्याचे चणे, काळा हरभरा, ऊस, तीळ, बाजरा (आय), जवार (आय).
उत्तरप्रदेश 2585076.36 भात, मका, उडीद, भुईमूग, सोयाबीन, ऊस, अरहर, जवार, बाजरा, तीळ, गहू, हरभरा, वाटाणा, मोहरी, बटाटा, मसुर
पश्चिम बंगाल 486718.53 अमान भात, ऑस बोरो भात, मका, गहू, रेइप व मोहरी, बटाटा
त्रिपुरा 1735.47 अमान भात, ऑस भात, बोरो भात, बटाटा
उत्तरांचल 23220.99 भात, रगी, गहू, बटाटा
अं. व नि. बेटे 106.00 भात
पॉण्डेचेरी 3719.53 भात I, II, III, कापूस, ऊस, भुईमूग
संरक्षित शेतकरी:-
पीक विमा सर्व ऋणको शेतक-यांना अनिवार्य व बिगर-ऋणको शेतक-यांना ऐच्छिक आहे.
संरक्षित जोखीम व अपवर्जन:
व्यापक जोखीम विमा बिगर टाळता येण्याजोग्या जोखीमा, उदा..:
१          नैसर्गिक आग व विजा
२         वादळ, गारपीट, चक्रीवादळ, तुफान, तुफान, तुफान, झंझावात इत्यादी.
३         पूर, जलमयता व माती घसरणे
४        अवर्षण, सुका पडणे
५        कीटक/ रोग
इत्यादी मुळे होणारे उत्पन्न नुकसान संरक्षित करण्या करिता तरतूद करेल.
टिप्पणी: युद्ध व आण्विक जोखीम, विव्देषपूर्ण नुकसान व इतर टाळता येण्याजोग्या जोखीमांमुळे होणारे नुकसान वगळण्यात येईल.

विमा हप्ता अर्थसहाय्य:
विमा हप्त्यामध्ये 50% अर्थसहाय्य भारत सरकार व राज्य/केंद्र शासित प्रदेश सरकार द्वारे समान प्रमाणात वाटून घेण्यात येणा-या लहान व किरकोळ शेतक-यांच्या संबंधा मध्ये देणे आहे. विमा हप्ता अर्थसहाय्य योजनेच्या कार्यान्वयनाच्या पहिल्या वर्षाच्या समाप्तिवर शेतक-यांचा प्रतिसाद व वित्तीय परिणामांच्या पुनर्विलोकनाच्या अधीन तीन ते पाच वर्षांच्या एका कालावधीमध्ये सूर्यास्त आधारावर एकावेळी देण्यात येईल.

क्षेत्र दृष्टिकोन व विम्याचे एकक :-
योजना “क्षेत्र दृष्टिकोन” आधारावर अर्थात विस्तीर्ण आपत्तिकरिता प्रत्येक अधिसूचित पीकासाठी निश्चित केलेली क्षेत्रे व स्थानिक आपत्ति उदा. गारपीट, माती घसरणे, चक्रीवादळ व पूर इत्यादी करिता व्यक्तिगत आधारावर चालविण्यात येईल. निश्चित केलेले क्षेत्र (अर्थात विम्याचे एकक क्षेत्र) एक ग्राम पंचायत, मंडळे, राज्य सरकार द्वारे निश्चित करण्यात येणा-या मंडळांचा किंवा जिल्हयांचा समूह असेल. तथापि, प्रत्येक भाग घेणा-या राज्य सरकारने तीन वर्षांच्या एका अधिकतम कालावधी मध्ये एकक रुपात ग्राम पंचायतीच्या स्तरापर्यंत पोहोचणे आवश्यक राहील.


विम्याची रक्कम/संरक्षणाची मर्यादा :
विम्याची रक्कम (एसआय) विमा उतरलेल्या शेतक-यांच्या विकल्पावर विमा उतरलेल्या पीकाच्या सुरुवातीच्या उत्पन्नाच्या किंमती पर्यंत वाढविण्यात येईल. तथापि, एक शेतकरी वाणिज्यिक दरांवर विमा हप्त्याच्या भरण्यावर निश्चित केलेल्या क्षेत्राच्या सरासरी उत्पन्नाच्या 150% पर्यंत सुरुवातीच्या उत्पन्न स्तराच्या किंमतीच्या पुढे त्याच्या पीकाचा विमा उतरवू शकेल. ऋणको शेतक-यांच्या प्रकरणा मध्ये विम्याची रक्कम अग्रिम पीक कर्जाच्या रक्कमेच्या कमीत कमी समान असावी. अधिक, ऋणको शेतक-यांच्या प्रकरणा मध्ये, विमा प्रभार कर्ज प्राप्त करण्याच्या प्रयोजना करिता वित्त परिमाणाच्या अतिरिक्त असतील. पीक विमा संवितरण प्रक्रियांच्या प्रकरणां मध्ये आरबीआय / नाबार्डचे मार्गदर्शन बंधनकारक राहील.

विमा हप्त्याचे दर:
विमा हप्त्याचे दर बाजरा व गळित धान्यांकरिता 3.5%, इतर खरीप पिकां करिता 2.5%, गहू करिता 1.5% व इतर रबी पिकांकरिता 2% आहेत. जर विमागणितीय आधार सामग्रीच्या आधारावर तयार केलेले दर विहित दरापेक्षा कमी आहेत तर, निम्न दर लागू होईल. लहान व किरकोळ शेतक-याची व्याख्या खालील अनुसार राहीलः-
किरकोळ शेतकरी: 1 हेक्टर किंवा कमी (2.5 एकर) जमीन धारण करणारा एक शेतकरी.

ऋतुमानता अनुशासन:
१)              ऋणको शेतक-यांकरिता पालन करण्यात येणारे विस्तृत ऋतुमानता अनुशासन खालील अनुसार राहीलः

कार्यक्रम खरीप रबी
कर्ज कालावधी एप्रिल ते सप्टेंबर ऑक्टोबर ते मार्च
घोषणा स्वीकृति करिता कट-ऑफ तारीख नोव्हेंबर मे
उत्पन्न आधार सामग्री स्वीकृतिकरिता कट-ऑफ तारीख जानेवारी / मार्च जुलै / सप्टेंबर

२)   बिगर-ऋणको शेतक-यांच्या संबंधा मध्ये प्रस्ताव स्वीकृति करिता विस्तृत कट-ऑफ तारखा खालील अनुसार राहतील :-
१          खरीप हंगामः 31 जुलै
२         रबी हंगामः 31 डिसेंबर
तथापि, ऋतुमानता अनुशासनात फेरबदल करण्यात येईल, जर आणि जेथे राज्य / केंद्रशासित प्रदेश व भारत सरकार सोबत विचारविनिमयामध्ये आवश्यक आहे.


संरक्षणाचे स्वरूप व क्षतिपूर्ति :-
राष्ट्रीय कृषि विमा योजना अंतर्गत भरपाई खालील सूत्रावर पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर आकारलेल्या सरासरी उत्पन्नाच्या आधारावर निश्चित केलेल्या क्षेत्रांमध्ये निश्चित केलेल्या पिकांकरिता परिगणित करण्यात येईल.

आरंभ उत्पन्न – वास्तविक उत्पन्न
- – - – - – - – - – - – - – - – - – - – - – - -    X  विम्याची रक्कम
आरंभ उत्पन्न (कर्ज मंजूर रक्कम)

जेथे:
आरंभ उत्पन्न = हमी प्राप्त उत्पन्न
वास्तविक उत्पन्न = निश्चित केलेल्या पीकाचे वर्तमान उत्पन्न
विम्याची रक्कम = मंजूर कर्ज

जेव्हा जेव्हा उत्पन्न नुकसान आढळेल, भरपाई रक्कम भारतीय कृषि विमा कंपनी मर्यादित द्वारे परिगणित करण्यात येईल, व ती संबंधित बॅंकां द्वारे पात्र ऋणकोंच्या खात्यांमध्ये जमा करण्यात येईल. एका विशिष्ट विमा एककामध्ये, जर वास्तविक उत्पन्न आरंभ उत्पन्नापेक्षा (हमी प्राप्त) अधिक आहे, तर भरपाई शून्य राहील.

पीक विम्याकरिता अर्ज कसा करावा
प्रत्येक पीक हंगामाच्या सुरुवातीला, जीआयसी सोबत सल्लामसलत करुन राज्य सरकार /केंद्र शासित प्रदेश प्रशासन पीके अधिसूचित करेल व क्षेत्रे निश्चित करेल, जी हंगामा दरम्याने योजने अंतर्गत संरक्षित करण्यात येतील. विमा हप्त्या सोबत पीक विम्याचा मासिक पीक-अनुसार व क्षेत्र-अनुसार तपशील नोडल पॉइण्टला पाठवावा व विविध कर्ज संवितरण पॉइण्ट कडून अशा माहितीच्या प्राप्तिवर नोडल पॉइण्ट निश्चित कट-ऑफ तारखांनुसार मासिक आधारावर त्याची छाननी करेल व तो जीआयसीला पारेषित करेल. ऋणको शेतक-याने कर्जा सोबत, ज्याकरिता बॅंक त्याला खाली निर्दिष्ट रुपात घोषणा प्रपत्र भरायला व संबंधित दस्तऐवज प्रस्ताव प्रपत्राला संलग्न करायला भाग पाडेल, पीक विमा घ्यावा. बिगर-ऋणको शेतकरी, जो योजने मध्ये दाखल होण्याकरिता इच्छुक आहे, त्याने प्रस्ताव व एनएआयएसचे घोषणा प्रपत्र भरावे व ते वाणिज्यिक बॅंकेची ग्राम शाखा किंवा क्षेत्रीय ग्रामीण बॅंक किंवा सहकारी बॅंकेची पीएसीएस मध्ये विम्याच्या हप्त्या सोबत सादर करावे. प्रस्ताव स्वीकारताना विमा रक्कमेच्या तपशील, अधिकतम मर्यादा इत्यादीची पडताळणी करणे शाखा/पीएसीएसची जबाबदारी आहे. तपशील त्यानंतर एकत्रीकृत आहे व तो सरकारच्या अधिसूचने मध्ये विनिर्दिष्ट तारखांच्या पूर्वी जीआयसी राज्य स्तरीय पीक विमा विभागाला पुढील प्रेषणाकरिता संबंधित नोडल पॉइण्टना पाठवावा.

संलग्न करण्या करिता प्रपत्रेः
  1. बिगर-ऋणको शेतक-या करिता प्रस्ताव प्रपत्र
  2. ऋणको शेतक-याकरिता घोषणा प्रपत्र
  3. बिगर-ऋणको शेतक-या करिता घोषणा प्रपत्र

कृषि विमा रक्कम / विमा हप्त्याची परिगणना :
विमा हप्त्याची रक्कम काही घटकांवर उदा. शेतक-याच्या जमीनीचा आकार, त्याची वित्तीय स्थिति, विमा उतरविण्यात आलेल्या पीकांची संख्या व विम्याच्या रक्कमेवर अवलंबून आहे. शेतकरी एक दावा प्रपत्र सादर करुन बॅंकांकडून दावा करु शकतील. दावा प्रतिनिधी पीकांना हानी पोचविणा-या कारणांच्या व्याप्तिचे विश्लेषण करतील. सर्वेक्षकाच्या अहवालावर आधारित, दावा एक महिन्याच्या आत शेतक-यांना देण्यात येईल.

कृषि विमा दाव्या करिता आवश्यक दस्तऐवज :

१          शेतक-याने पदनिर्देशित शाखा / पीएसीएस जवळ जाणे आवश्यक आहे व विहित स्वरुपामध्ये प्रस्ताव प्रपत्र सादर करावे.
२         शेतक-याने लागवडयोग्य जमीनीच्या कब्जाच्या संबंधामध्ये दस्तऐवजी पुरावा सादर करणे आवश्यक आहे (पास बुक व उता-याची प्रत).
३         जमीन महसूल पावती संलग्न करावी.
शेतक-याने, जर आवश्यक असेल तर, क्षेत्र पेरणी पुष्टीकरण प्रमाणपत्र पुरवणे आवश्यक आहे.
दावा मान्यता व समझोता करिता प्रक्रिया:
१. विहित कट-ऑफ तारखांनुसार राज्य/केंद्र शासित प्रदेश सरकारांकडून एकदा उत्पन्न आधार सामग्री प्राप्त झाली, तर दावे आयए द्वारे तयार करण्यात व समझोता करण्यात येतील.
२. दावा  तपशीलांसोबत दावा धनादेश व्यक्तिगत नोडल बॅंकांना प्रदान करण्यात येतील. बॅंक सामान्य लोकांच्या स्तरावर, आळीपाळीने, व्यक्तिगत शेतक-यांच्या खात्यांमध्ये जमा करेल व त्याच्या सूचना फलकावर लाभाधिका-यांचा तपशील प्रदर्शित करील.
३. स्थानिक घटनेच्या उदा. गारपीट, माती घसरणे, चक्रीवादळ व पूर इत्यादीच्या संदर्भामध्ये आयए, डीएसी/राज्य/केंद्रशासित प्रदेशांसोबत विचार विनिमय करुन व्यक्तिगत शेतकरी स्तरावर अशा हानिचा अंदाज करण्या करिता एक प्रक्रिया विकसित करेल. अशा दाव्यांचा समझोता आयए व विमेदार दरम्याने व्यक्तिगत आधारावर करण्यात येईल.

हवामान विमा योजनाः
हवामानाच्या लहरींमुळे होणा-या हानिकरिता विमा-अधिक पाऊस, पावसात तूट, सूर्यप्रकाशाची उणीव इ.
आरंभ करण्यात आलेल्या हवामान विमा योजना : वर्षा बीमा२००५
व्याप्ति :
वर्षा बीमा तुटीच्या पावसामुळे पीक उत्पन्ना मध्ये अपेक्षित तुटीला संरक्षण देते. वर्षा बीमा शेतक-यांच्या सर्व प्रकारां करिता ऐच्छिक आहे. ज्यांना पावसाच्या अनिष्ट आपातामुळे वित्तीय रूपात नुकसान पोहचले आहे, ते योजने अंतर्गत विमा घेऊ शकतील. सुरुवातीपासून वर्षा बीमा शेतक-यांकरिता अर्थपूर्ण आहे, ज्यांच्या करिता राष्ट्रीय कृषि विमा योजना (एनएआयएस) ऐच्छिक आहे.


विम्याचा कालावधी :
विमा लघु कालावधी पिकां करिता जून ते सप्टेंबर, मध्यम कालावधी पिकां करिता जून ते ऑक्टोबर व दीर्घ कालावधी पिकांकरिता जून ते नोव्हेंबर दरम्याने उपयोगात येतो. अधिक, हे कालावधी राज्य-विनिर्दिष्ट आहेत. पेरणी अपयश विकल्पाच्या प्रकरणामध्ये तो 15 जून ते 15 ऑगस्ट पर्यंत आहे.

वर्षा बीमा कसा खरेदी कराल :
प्रस्ताव प्रपत्रे सर्व कर्ज संवितरण केंद्रावर उदा. सर्व सहकारी / वाणिज्यिक / ग्रामीण बॅंकांच्या पीएसी शाखांवर उपलब्ध आहेत. सामान्य लोकांच्या स्तरावर वर्षा बीमा अंतर्गत संरक्षण एनएआयएस, विशेषतः सहकारी क्षेत्र संस्था, रूपात ग्रामीण वित्त संस्थांच्या (आरएफआय) वर्तमान जाळ्या मार्फत बहुधा देण्यात येईल. तसेच एआयसी त्याच्या जाळ्याच्या उपलब्धतेच्या अधीन प्रत्यक्ष बाजार / विम्याची तरतूद करेल. ग्रामीण क्षेत्रांमध्ये कार्य करणा-या संस्था औपचारिक व अनौपचारिक संस्था उदा. एनजीओ, स्वयं मदत समूह (एसएचजी), शेतक-यांच्या समूहांचे जाळे वर्षा बीमाच्या बटवड्याकरिता उपयोगात आणता येऊ शकेल. वर्षा बीमा अंतर्गत विम्या करिता प्रस्तावित शेतक-यां जवळ आरएफआय शाखेमध्ये एक बॅंक खाते असणे आवश्यक आहे, जी त्याचे/तिचे विमा व्यवहार सुकर करेल.

विमा खरेदी कालावधी :
एक शेतकरी इतर विकल्पांकरिता 30 जून व पेरणी अपयश विकल्पा करिता फक्त 15 जून पर्यंत वर्षा बीमा खरेदी करु शकेल.

संरक्षण विकल्पः
विकल्प - I: मोसमी पर्जन्यमान विमा :
संपूर्ण हंगामा करिता साधारण पर्जन्यमानाकडून (मिमी. मध्ये) वास्तविक पर्जन्यमाना मध्ये 20% व अधिकच्या नकारात्मक विचलना समोर संरक्षण दिलेले आहे. वास्तविक पर्जन्यमान जून ते नोव्हेंबर पर्यंत मासिक संचयी पर्जन्यमान आहे (लघु व मध्यम कालावधी पिकांकरिता जून ते सप्टेंबर किंवा ऑक्टोबर सोबत). पैसे पूर्णपणे देण्याची संरचना ह्या प्रकारे बनविण्यात आली आहे की, उत्पन्न पर्जन्यमानामध्ये प्रतिकूल विचलनाच्या विविध श्रेणीशी परस्पर संबंद्ध आहे. प्रत्येक हेक्टर विम्याची रक्कम अधिकतम संभाव्य हानिच्या तदनुरुप अधिकतम पैसे पूर्णपणे देणे आहे. दावा पैसे पूर्णपणे देणे एका श्रेणीबद्ध प्रमाणांवर (टप्प्यां मध्ये) राहील, जे वास्तविक पर्जन्यमानामध्ये प्रतिकूल विचलनाच्या विविध प्रमाणांनुसार असेल.
विकल्प – II: पर्जन्यमान वितरण निर्देशांक :
संपूर्ण हंगामा करिता साधारण पर्जन्यमान निर्देशांका कडून वास्तविक पर्जन्यमान निर्देशांकामध्ये 20% व अधिकच्या प्रतिकूल विचलना समोर संरक्षण दिलेले आहे. निर्देशांक हंगामा मध्ये साप्ताहिक पर्जन्यमाना करिता परस्पर संबंध वाढविण्याकरिता निर्माण करण्यात आलेला आहे. निदेशांक आयएमडी स्टेशन ते स्टेशन व पीक ते पीक पर्यंत कमी अधिक होतील. प्रत्येक हेक्टर विम्याची रक्कम अधिकतम संभाव्य हानिच्या तदनुरुप अधिकतम पैसे पूर्णपणे देणे आहे. दावा पैसे पूर्णपणे देणे एका श्रेणीबद्ध प्रमाणावर (टप्प्यांमध्ये) राहील, जे वास्तविक पर्जन्यमान निर्देशांका मध्ये प्रतिकूल विचलनाच्या विविध प्रमाणांनुसार असेल.

विकल्पIII: पेरणी अपयश :
15 जून व 15 ऑगस्ट दरम्याने 40%  पुढे साधारण पर्जन्यमान (मिमी. मध्ये) कडून वास्तविक पर्जन्यमाना मध्ये (मिमी. मध्ये) प्रतिकूल विचलना समोर संरक्षण दिलेले आहे. प्रत्येक हेक्टर विम्याची रक्कम पेरणी कालावधीच्या समाप्ती पर्यंत शेतक-या द्वारे केलेला अधिकतम निविष्ट खर्च आहे व ती पूर्व विनिर्दिष्ट आहे. दावा पैसे पूर्णपणे देणे एका श्रेणीबद्ध प्रमाणावर राहील, जे पर्जन्यमान विचलनांच्या विविध प्रमाणानुसार असेल. विम्याच्या रक्कमेच्या 100% अधिकतम पैसे पूर्णपणे देणे 80% व अधिकच्या विचलनांवर उपलब्ध आहे.
विम्याची रक्कम :
विम्याची रक्कम पूर्व-विनिर्दिष्ट आहे व साधारणपणे उत्पादन खर्च व उत्पादनाची किंमत दरम्याने आहे. पेरणी अपयश विकल्पाच्या प्रकरणा मध्ये, पेरणी कालावधी, जो पुन्हा पूर्व-विनिर्दिष्ट आहे, समाप्ती पर्यंत तो शेतक-या द्वारे केलेला अधिकतम निर्विष्ट खर्च आहे.

विमा हप्ता :
विमा हप्ता विकल्प ते विकल्प व पीक ते पीक पर्यंत कमी अधिक होईल विमा हप्त्याचे दर लाभ लक्षात घेऊन आशावादी आहेत, व 1% पासून सुरु होतात.
दावा भरण्याचे वेळापत्रक व प्रक्रिया:
दावे तयार करण्याची प्रक्रिया स्वयंचलित आहे अर्थात विमेदार शेतक-या द्वारे दाव्यांची सूचना किंवा गहाळ माहिती सादर करण्या करिता आवश्यकता नसेल. साधारणपणे दावे क्षतिपूर्ति कालावधीच्या समाप्ती पासून एका महिन्या मध्ये वास्तविक पर्जन्यमान आधार सामग्रीच्या आधारावर चुकता करण्यात येणार आहेत.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

तिळाचे बियाणे

तिळाचे बियाणे बारीक असल्याने जमीन चांगली तयार करावी. उन्हाळ्यात उभी-आडवी वखरणी करून जमीन चांगली भुसभुशीत करावी, काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे व पठार फिरवून पेरणी करावी. अर्ध रब्बी हंगामात वखराच्या पाळ्या देऊन जास्तीत जास्त पाणी शेतात मुरवावे.
बियाण्याचे हेक्‍टरी प्रमाण -खरीप व अर्ध-रब्बी हंगामाकरिता प्रति हेक्‍टरी दीड ते दोन किलो व उन्हाळी हंगामाकरिता तीन ते चार किलो बियाणे वापरावे.

बीजप्रक्रिया -पेरणीपूर्वी थायरम किंवा कार्बेन्डाझिम यांपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति किलो, तसेच ट्रायकोडर्मा व्हिरीडी चार ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

पेरणीची योग्य वेळ -खरिपातील पेरणी जूनचा शेवटचा किंवा जुलैचा पहिला आठवडा.
अर्ध-रब्बी -सप्टेंबरचा पहिला पंधरवडा.
उन्हाळी -फेब्रुवारीचा पहिला पंधरवडा.
पेरणीची पद्धत -बियाणे फार बारीक असल्यामुळे त्यात समप्रमाणात वाळू/गाळलेले शेणखत/राख/माती मिसळावी. पाभरीने/तिफणीने 30 सें.मी. वर पेरणी करावी.
आंतरपिके -तीळ हे आपत्कालीन पीक, आंतरपीक आणि मिश्र पीक म्हणून घेता येते. आंतरपीक पद्धतीमध्ये तीळ + मूग (3ः3), तीळ + सोयाबीन (2ः1), तीळ + कापूस (3ः1) हे फायदेशीर आढळून आलेले आहे.

रासायनिक खतांची मात्रा देण्याची वेळ 
पेरणीच्या वेळेस अर्धे नत्र (12.5 कि./हे.) व पूर्ण स्फुरद (25 कि./हे.) देऊन दुसरा हप्ता पेरणीनंतर 30 दिवसांनी उरलेल्या नत्राचा (12.5 कि./हे.) द्यावा. एकेटी-64 या वाणाकरिता रासायनिक खतां ची मात्रा 40 किलो नत्र व 25 किलो स्फुरद प्रति हेक्‍टरी एवढी द्यावी, तसेच पेरणीच्या वेळेस झिंक व सल्फर 20 किलो प्रति हेक्‍टर या प्र माणात दिले असता उत्पन्नात वाढ होते.

विरळणी/ खाडे भरणे -
रणीनंतर सात-आठ दिवसांनी नांगे भरावेत. पेरणीनंतर 15-20 दिवसांनी पहिली व आठ दिवसांनी दुसरी विरळणी करून दोन रोपात 10-15 सें.मी. अंतर ठेवावे. म्हणजे शेतात हेक्‍टरी 2.25 ते 2.50 लाख रोपांची संख्या राहील.

आंतरमशागत -
आवश्‍यकतेनुसार दोन ते तीन कोळपण्या/ खुरपण्या देऊन व निंदण करून शेत स्वच्छ ठेवावे. पीक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तण होणार नाही याची काळजी घ्यावी.

ओलित व्यवस्थापन -
उन्हाळी पिकास/ अर्ध रब्बी पिकास आवश्‍यकतेनुसार पेरणीपूर्व व पेरणीनंतर ताबडतोब व नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12-15 दिवसा ंनी ओलित करावे. फुलोऱ्यास सुरवात होताना व बोंड्या भरताना ताण पडल्यास सुरक्षित ओलित द्यावे. ओलित करताना पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

वेळेवर कापणी महत्त्वाची -
तिळाच्या कापणीस उशीर झाल्यास बोंड्या फुटून बी सांडते व नुकसान होते, त्यामुळे कापणी वेळेवर करावी. झाडाची पाने पिवळी पडून बोंड्या पिवळ्या होण्यास सुरवात होताच पीक कापणीस तयार झाले असे समजावे. कापणी केल्यावर ताबडतोब पेंड्या बांधून त्या उभ्या रचून ठेवाव्यात. तीन ते चार दिवसांनी बोंड्या वाळल्यानंतर ताडपत्रीवर हळूच उलटे धरून काठीच्या साहाय्याने तीळ झाडावे. काही बोंड्या तडकल्या नसल्यास चार ते पाच दिवसांनी परत पेंड्या झाडाव्या व बियाणे स्वच्छ करून आणि वाळवून साठवावे. तिळाचे हेक्‍टरी आठ ते दहा क्विंटल उत्पादन मिळते.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

पिके



राष्ट्रीय कृषी विमा योजना
सर्वकष पीक विमा योजनेची पीक कर्ज घेणाय्रा शेतकय्रांपुरते मर्यादीत स्वरूप बदलून कर्जदार तसेच बिगर कर्जदार अशा सर्वच शेतकय्रांना सहभागी करून घेणारी राष्ट्रीय कृषी विमा योजना हि सुधारीत स्वरूपात सन १९९९-२००० च्या रब्बी हंगामापासुन राज्यात राबविण्यात येत आहे. यामध्ये विमा संरक्षित रकमेवरील मर्यादा (रू. १००००) रद्द होऊन पेरणी केलेल्या संपूर्ण क्षेत्राला विमा संरक्षण देण्याची तरतुद या राष्ट्रीय कृषी विमा योजनेत करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत सन १९९९-२००० रब्बी ते सन २००६-०७ खरीप हंगामापर्यंत रूपये ९२४ कोटींची नुकसानभरपाई अदा करण्यात आलेली आहे.
प्रमुख उद्देश
१) नैसर्गिक आपत्तीमध्ये तसेच कीड व रोगराईचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकय्रांना सदरील योजनेच्या माध्यमातुन आर्थीक मदत देणे. २) शेतकय्रांच्या शेतामध्ये प्रगत तंत्रज्ञान तसेच योग्य त्या निविष्ठा वापरण्यास प्रोत्साहित करणे. ३) आपतीसमयी शेतकय्रांना आथिक स्थैर्य देण्यामध्ये मदत करणे.
योजनेत भाग घेण्यासाठी पात्र शेतकरी
१) योजनेमध्ये कर्जदार व बिगर कर्जदार शेतकय्रांना भाग घेता येतो. २) राष्ट्रीय कृषी विमा योजनेमध्ये शेतकय्रांकरिता खातेदारांच्या व्यतिरीक्त कुळांसाठी सुद्धा ही योजना खुली ठेवण्यात आलेली आहे.
योजनेची वैशिष्ट्ये
१) नविन पिकांचा समावेश करून योजनेची व्याप्ती वाढविलेली आहे. ऊस, मुग, उडीद, कापूस, मका व कांदा पिकांचा समावेश नव्याने करण्यात आलेला आहे. २) विमा संरक्षित रकमेवरील मर्यादा काढुन टाकलेली आहे. ३) विमा संरक्षित रकमेची व्याप्ती वाढून त्याची सांगळ सरासरी उत्पन्न व किमान आधारभुत किमतीशी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रति हेक्टरी पीक कर्जदाराचे विमा संरक्षित रकमेवरील बंधन आपोआप नाहिसे होते. ४) शेतकय्रांना सर्वसाधारन जादा पीक संरक्षित रक्कम (सरासरी) उत्पन्नाच्या १५० टक्क्यापर्यंत विमा उपलब्ध आहे. ५) विविध पिकांचे राजस्व मंडळनिहाय उंबरठा उत्पन्न हे त्यापिकांचे मागील ३ ते ५ वर्षांचे सरासरी उत्पन्न आणि त्या पिकांचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित करण्यात येते. ६) अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी पीक विमा हप्ता रकमेत १० टक्के अनुदान आहे.
योजनेत समाविष्ट पिके
१) तृणधान्यः- भात, खरीप व रब्बी ज्वारी, बाजरी, नाचनी, मका, गहू.
२) कडधान्यः- तुर, उडीद, मुग, हरभरा.
३) गळीतधान्यः- भुईमूग, सोयाबीन, करडई, सुर्यफूल, तीळ, कारळे.
४) व्यापारी पिकेः- ऊस, कापूस, कांदा.
पीक विमा संरक्षित रकमेचे प्रमाण
योजनेमध्ये विमा संरक्षित रकमेवर कोणत्याही प्रकारची मर्यादा दिलेली नाही. संबंधित शेतकरी त्याच्याकडे असलेल्या जमिनीच्या क्षेत्राच्या आधारे विमा संरक्षण घेऊ शकतो. प्रति हेक्टरी किमान विमा संरक्षण हे सरासरी उत्पन्नाच्या ६० टक्के किंवा ८० टक्के (या उत्पन्नाला उंबरठा उत्पन्न म्हणतात) गुणिले किमान आधाभूत किमतीवर आधारित असून ३ / ५ वर्षाचे सरासरी उत्पन्न गुणिले किमान आधाभूत किंमत यांच्यापेक्षा १५० टक्क्यांपर्यंत रकमेवर कमाल विमा संरक्षण घेता येईल. क्षेत्राची व रकमेची मर्यादा नाही.
विमा हप्ता दर: विमा हप्त्यांचे सर्वसाधारण दर खालीलप्रमाणे राहतील.
अ) खरीप हंगाम:
बाजरी व तेलबिया ३.५० टकके किंवा वस्तुनिष्ट दर यापैकी जो कमी असेल तो दर.
उर्वरित खरीप पिके: २.५० टकके किंवा वस्तुनिष्ट दर यांपैकी जो कमी असेल तो दर.
रब्बी हंगाम: गहू १.५० टकके किंवा वस्तुनिष्ट दर यापैकी जो कमी असेल तो दर.
उर्वरित रब्बी पिके: २.०० टकके किंवा वस्तुनिष्ट दर यापैकी जो कमी असेल तो दर.
वार्षिक,व्यापारी व फळवर्गीय पिके: वस्तुनिष्ट दर
विमा हप्त्यावर शासनाकङून मिळणारे अनुदान: या योजनेत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकय्रांसाठी १० टकके अनुदान देण्यात येते.
अल्प भूधारक: १ ते २ टकके हेक्टरपर्यंत धारण केलेले क्षेत्र.
अत्यल्प भूधारक: १ हेक्टरपर्यंत धारण केलेले क्षेत्र.
पीक विमा योजनेची अंमलबजावणी: पीक विमा योजना लागू करण्यासाठी मका, कांदा व ऊस  पिकांकरिता तालुकास्तरावर व इतर पिकांसाठी महसूल मंङळ हे घटक ठरविण्यात आलेले आहेत. पीक कापणी प्रयोगांवर आधारित सरासरी उत्पन्न त्या मंङळ / तालुक्यांचे  उत्पन्न राहिल.
नुकसानभरपाई ठरविण्यासाठी पध्दती
नुकसानभरपाई ठरवितांना चालू वर्षी असलेल्या सरासरी उत्पन्नाची तुलने ही त्या मंडळ / तालुक्याच्या उंबरठा उत्पन्नाशी करण्यात येते.
नुकसानभरपाई ठरविण्याचे सूत्र
नुकसान भरपाई=   (उंबरठा उत्पन्न – आलेले चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न/   उंबरठा उत्पन्न )
× विमा संरक्षित रक्कम
विदर्भातील ६ जिल्ह्यांतील शेतकय्रांना पॅकेजव्दारे विशेषबाब म्हणून पीक विमा योजनेव्दारे देण्यात आलेली सवलत.
विर्दभात घेण्यात येत असलेल्या पिकांचे उंबरठा उत्पन्न हे बहुतांशी ६० टक्के जोखीमस्तरावर ठरविले जात असल्याने परिणामी देय नुकसानभरपाई प्रमाणही कमी राहात असून शेतकय्रांना नैसर्गीक आपत्तीमुळे पिकांचेनुकसान होउनही अपेक्षेइतकी नुकसानभरपाई मिळू शकत नाही. योजनेतील या प्रमुख त्रुटींवर मात करण्यासाठी शासनाने विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ व वर्धा या ६ जिल्ह्यातील शेतकय्रांनसाठी विशेषबाब म्हणून कापूस पिकांचे उंबरठा उत्पन्न ८० टक्के जोखिमस्तरावर निश्चित करून त्यासाठी जो ज्यादा विमा हफ्ता दर शेतकय्रांना द्यावा लागेल तो द्यावा लागू नये म्हणून अल्प व अत्यल्प भुधारक शेतकय्रांना देण्यात येणारे अनुदान १० टक्क्यानऐवजी ७५ टक्के व इतर शेतकय्रांना यापूर्वी अनुदान देय नसतांना ५० टक्के अनुदान पॅकेजव्दारे घेण्याचा निर्णय घेतला आहे. इतर पिकांसाठी मात्र उंबरठा उत्पन्न पातळी सर्वसाधारण येणाय्रा जोखीमस्तराप्रमाणे ठेवण्यात आलेली आहे, परंतु अल्प व अत्यल्प भूधारक शेतकय्रांना १० टक्के अनुदानाऐवजी ५० टक्के अनुदान देण्याबाबतची पॅकेजव्दारे तरतुद करण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी करावयाची कार्यवाही कर्जदार व बिगर कर्जदार शेतकय्रांसाठी विमा प्रस्ताव सादर करावयाचे वेळापत्र
उच्च न्यायालय / सर्वोच्च न्यायालयाचे अंतरिम आदेशानुसार कर्जदार शेतकय्रांना पीक विमा योजना सक्तीची नाही. कर्जदार शेतकय्रांना योजना ऐच्छिक झाल्यामुळे बँका कर्जदार शेतकय्रांचा विमा हप्ता वसुलकरून विमा प्रस्ताव विमाकंपनीस पाठविणार नाहीत. कर्जदार शेतकय्रांना नविन नियमानुसार पीक विमा योजनेत भाग घेण्यासाठीची पद्धती बिगर कर्जदार शेतकय्रांप्रमाणे राहनार आहे. कर्जदार शेतकय्रांना बिगर कर्जदार शेतकय्रांप्रमाणे विमा प्रस्ताव पत्र विमा हप्त्यासह ३१ जुलै २००७ पर्यंत बँकाकडे भरून योजनेत सहभागी व्हावे लागेल. (बँका पूर्वीप्रमाणे स्वतः कार्यवाही करणार नाही). कर्जदार शेतकय्रांनी स्वतः (ऐच्छिकरित्या) विमा प्रस्ताव पत्रक विमा हप्त्यासह बँकाकडे भरल्यानंतरच विमा संरक्षण मिळणार आहे.
शेतकय्रांनी घेतलेले पीक कर्ज व विमा योजनेतील सहभाग एकमेकांशी निगडीत राहीलेले नाही. योजनेतील नविन बदल पीक वीमा योजनेची अंमलबजावणी करणारे सर्व संबंधित बँका, जिल्हाधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, यांना कृषी आयुक्तालयामार्फत कळविण्यात आलेले आहे. त्यामुळे सुधारीत वेळपत्रक पुढीलप्रमाणे आहे.

  • सर्व शेतकय्रांनी (कर्जदार व बिगर कर्जदार) विमा प्रस्ताव बँकाना सादर करणेः ३१ जुलै २००७ (चालु वर्षी मुदत दिनांक ३१-०८-२००७ पर्यंत वाढविली आहे.)
  • बँकानी विमा प्रस्ताव कृषी विमा कंपनीस पाठविणेः ३१-०८-२००७ योजनेच्या अधिक माहितीसाठी क्षेत्रीय पातळीवर कोणाशी संपर्क साधावा ?
१) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा, २) राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा, ३) नजीकच्या विविध कार्यकारी सोसायट्या, ४) कृषी खात्याची मंडळ / तालुका / उपविभाग आणि जिल्हा स्तरावरील कार्यालये, ५) जिल्हाधिकारी कार्यालये.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

फळरोपवाटीका

शासकीय फळरोपवाटीका व्यवस्थापन

फलोत्पादनाकडे निश्चित व श्वाश्वत उत्पादन देणारे क्षेत्र म्हणून शेतकरी ओळखतात. विविध फळ पिकांना असलेले पोषक हवामान विचारात घेता, ज्या फळपिकांना ज्या विभागात वाव आहे त्या विभागात त्या विभागात त्या त्या फळपिकांच्या रोपवाटीकांची स्थापना करण्यात आली आहे. सध्या राज्यात १ राज्यस्तरीय, २९ जिल्हास्तरीय, १०४ तालुकास्तरीय आणि २ पश्चिमघाट विकास अंतर्गत अशा एकूण १३६ फळ रोपवाटिका कार्यरत आहेत. राज्यात सन १९९०-९१ पासून रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड कार्यक्रम सुरू झाल्यानंतर या कार्यक्रमासाठी आवश्यक कलमा / रोपाची उपलब्धता राज्यातील शासकीय, कृषी विद्यापीठ व पंजीकृत खाजगी रोपवाटीकांवरून करण्यात येत आहे. आज राज्यात १३६ शासकीय फळरोपवाटीकांबरोबरच कृषी विद्यापीठांच्या ४२ तर १३०० पंजीकृत खाजगी रोपवाटीका स्थापन झालेल्या आहेत. या सर्व रोपवाटीकांवर सध्या सुमारे २.५ ते ३.०० कोटी कलमे व रोपे उपलब्ध होतात.

सन २००७-०८ या वर्षात शासनाने रोहयो अंतर्गत व राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळबाग लागवडीसाठी ७८,००० हेक्टरचे लक्षांक ठरविले असून त्यासाठी २.९४ कोटी कलमे / रोपे आवश्यक आहेत. या सर्व फलोत्पादन विकास कार्यक्रमांसाठी तसेच रोख विक्रींसाठी शासनाने कलमा / रोपांचे विक्रीवर निश्चित केलेले आहेत. सदरच्या विक्रीदराचा तपशील शेतकरी मासिकाच्या माहे ऑगस्ट-२००७ च्या अंकात पृष्ठ क्रमांक ४१ वर दिलेला आहे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Text

Followers

Blogroll